Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र

Rajyasabha Election:...अन् संजय राऊत थोडक्यात बचावले!

वैष्णवी कारंजकर

कालचा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा रंगतदार ठरला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं आणि त्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला. अगदी अटीतटीच्या या लढतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा मोठा पराभव झाला तर संजय राऊत थोडक्यात बचावले आहेत. (Shivsena Sanjay Raut won Rajyasabha Election 2022)

राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यासाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपाचे पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय पवार, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. त्यापैकी पीयूष गोयल यांना सर्वच्या सर्व ४८ मतं मिळाली आहेत.

तर अटीतटीच्या या लढतीमध्ये संजय राऊतांना थोडक्यात विजय मिळाला आहे. त्यांना ४१ मतं मिळाली आहेत. तर भाजपाच्या अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना सर्वाधिक ४८ मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेचे कोल्हापुरातले उमेदवार संजय पवार यांना ३९ मतं मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेले भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक हे ४१ मतांनी विजयी झाले आहेत.

सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीतल्या पाच जागा निश्चित होत्या. मात्र सहाव्या जागेसाठी लढत होती. यासाठी भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार आमनेसामने होते. या लढतीमध्ये पहिल्या फेरीत संजय पवारांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली तर महाडिकांना २७ मतं मिळाली. मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित १० मतं फुटल्याने धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची मतं मिळाली. त्यामुळे संजय पवार केवळ २ मतांनी हरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT