Ramdas Athawale esakal
महाराष्ट्र बातम्या

काही तरी इतिहास घडेल आणि ठाकरे सरकार पडेल; रामदास आठवलेंचा दावा

कायदे मागे घेऊनही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करा

उमेश बांबरे

मार्च महिन्यात सरकार पडेल, असे मंत्री नारायण राणे यांनी भाकीत केले आहे.

सातारा : राज्यात शेतकरी, एसटी कामगार, दलितांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले त्याप्रमाणे काही तरी इतिहास घडेल आणि सरकार पडेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधानांनी कृषी कायदे (Agricultural laws) मागे घेतल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन घरी जावे. आंदोलन सुरूच ठेवले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘मार्च महिन्यात सरकार पडेल, असे मंत्री नारायण राणे यांनी भाकीत केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) सातत्याने वाद सुरू असून, एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. या सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही. शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, एसटी कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही, दलितांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे काही तरी इतिहास घडेल आणि सरकार पडेल.’’

श्री. आठवले म्हणाले, ‘‘कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधानांनी हे तीन कायदे मागे घेतले आहेत. आता संसदेत विधेयक येणार असून, कायदे मागे घेण्याबाबतचा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे; पण आंदोलन मागे घेतले जात नाही. शेतकरी नेते राकेश टिकैत व अन्य नेते आंदोलन मागे घेत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.’’

एसटी विलीनीकरणास रिपाईंचा पाठिंबा

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून, सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा. यासंदर्भात नेमलेल्या समितीने अशा पद्धतीचा निर्णय दिला, तर त्याप्रमाणे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा सल्ला आठवलेंनी दिला. आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जास्तीतजास्त मदत मिळावी, त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT