Ramdas Athwale
Ramdas Athwale 
महाराष्ट्र

महाशिवआघाडीचे सरकार पवारांमुळे टिकेल : रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन होत असलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाशिवआघाडीचे सरकार शरद पवार यांच्यामुळे टिकेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शुक्रवार) शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आठवले यांनी हे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आठवले म्हणाले, की शरद पवार असल्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकू शकेल. वैचारिक मतभेद होणार नाही, हे ते पाहतील. अडीच वर्षे शिवसेनेला आणि अडीच वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरु आहे, पाहूया काय असेल. जर, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचंय हे आधी माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता. महायुतीचं सरकार यावे यासाठी मी प्रयत्न  केले. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहिली. पण भाजप ऐकत नाही हे पाहून त्यांना सत्तेबाहेर ठेवायचं हे शिवसेनेने ठरवले. काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही असं वाटलं होतं, पण आता त्यांनी पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा. त्यांनी जनतेची कामे करावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT