Sahitya Sammelan 2023  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sahitya Sammelan 2023 : बाळासाहेब ठाकरे साहित्य संमेलनाला चक्क बैलबाजार म्हणाले होते

जेव्हा बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला घेतलेले २५ लाख परत करा, असे सुनावले!

सकाळ डिजिटल टीम

९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आजपासून सुरूवात होत आहे.  ३, ४, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वावलंबी विद्यालयाचे प्रांगण, वर्धा येथे होईल. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे.

आजवर या साहित्य संमेलनाला अनेक वादांना सामोरे जावे लागले आहे. त्यापैकी १९९५ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात झालेला वाद राजकियदृष्ट्याही गाजला. त्यात शिवसेना विरूद्ध साहित्य संमेलन असे चित्र पहायला मिळाले होते. काय होते ते प्रकरण पाहुयात.

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे म्हणजे जिवंत तोफचं. ती कधी कोणावर डागली जाईल याचा नेम बाळासाहेबांनाही नव्हता. बाळासाहेब जितके स्पष्टवक्ते तितकेच ते हळवेही होते. त्यामुळेच ते आजही मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करतात. कारण, ते मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढले. पण, बाळासाहेबांचे नाव मराठी साहित्य संमेलनावर टिका करणाऱ्या लोकांतही घेतले जाते.

१९९५ मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार आले तेव्हा पहिला वाद झाला तो बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने. या वादाचे मळभ १९९७च्या जानेवारीत नगर येथे झालेल्या ना. सं. इनामदार यांच्या संमेलनावर होते. 

दोन वर्षांनी पुन्हा मुंबईत हेच घडले. हे साहित्य संमेलन पाच ते सात फेब्रुवारी, १९९९ या दिवसांत शिवतीर्थावर ज्येष्ठ कवी वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तेव्हा राज्यात युतीचेच सरकार होते. स्वागताध्यक्ष मनोहर जोशी संमेलनाच्या काही दिवस आधी मुख्यमंत्रिपदावरून गेले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात वसंत बापट यांनी आविष्कार स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केले वादाची ठिणगी पडली.

मुख्य संमेलनाच्या विरोधात होणारी विद्रोही व सकल संमेलने हा आधी वादाचा, चर्चेचा विषय होता. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱ्याच दिवशी ‘सरकारचे २५ लाख रुपये घेताना साहित्यिकांना शरम वाटली नाही का? हे आमच्यावर कशासाठी टीका करताहेत? यांनी समाजासाठी काय केले आहे?’ अशा जबरदस्त फैरी झाडून तो सामना ‘शिवसेना विरुद्ध साहित्यिक’ असा करून टाकला. सरकारी अनुदानाचे २५ लाख परत करा आणि मगच टीका करा. साहित्य संमेलन म्हणजे नुसता बैलबाजार असतो.’ असेही त्यांनी सुनावले.

यावर साहित्य संमेलनाच्या मंचावरूनच वसंत बापट समारोपीय भाषणात सडकून प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही घेणारे असताना, तुम्हाला देण्याची सवय कधी लागली?’ या बोचऱ्या प्रश्नापासून ‘आम्ही तुमच्या २५ लाखच काय, २५ कोटी असतील तरी त्यांच्यावर थुंकतो,’ असे बापट म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ‘कोणीही एखादा दांडगेश्वर आमच्या तोंडात २५ लाखांचे बूच ठोकू पाहात असला तरी, आमचा आत्मा आम्ही काही विकायला काढलेला नाही. एखाद्या हुकूमशहाने कितीही शर्थ केली तरी सामान्य माणसे त्याचा ‘रिमोट कंट्रोल’ मोडून-तोडून फेकून देऊ शकतात,’ असे बापट संतापून म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT