Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel sakal
महाराष्ट्र

'संभाजीनगर'चे खासदार जलील नामांतरावरून आक्रमक; म्हणाले औरंगाबाद हेच...

दत्ता लवांडे

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने २९ जून रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेत औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) शहराच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर थोड्याच वेळात महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेशी बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि दुसऱ्या दिवशी (३० जून) शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

(Sambhajinagar City News)

महाविकास आघाडी सरकारने आपलं सरकार कोसळण्याच्या काही तास अगोदर तब्बल १० निर्णय घेतले. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयाच्या यादीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामांतर करून अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण करण्यास मंजूरी दिली आहे. पण या निर्णयाला संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. शहराचे नाव बदलून काय साध्य करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर या नामांतराच्या विरोधासाठी एकत्र येण्यासाठी त्यांच्याकडून सर्व पक्षांना मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान जलील यांनी संभाजीनगर मध्ये काही नेत्यांची सभा घेतली. या सभेत आपण सर्व धर्माच्या नेत्यांना, पक्षाच्या नेत्यांनाही पत्र पाठवले आहे. गुरूद्वाराचे अध्यक्ष, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष, आंबेडकरी विचारी चळवळीचे प्रमुख नेते अशा महत्त्वाच्या नेत्यांना पत्र पाठवून सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यास मागणी केली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं.

माझ्या जन्मपत्रावर देखील औरंगाबाद हेच नाव असेल आणि माझ्या मृत्यूपत्रावर देखील हेच नाव असेल असं त्यांनी या सभेत म्हटलं आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या वेळी आपण शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला नक्कीच विचारेल की, जेव्हा या शहराचं नामांतर होत होतं, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून मला मृत्यू देखील औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर औरंगाबाद आहे तर डेथ सर्टिफिकेटवरही औरंगाबादच असायला हवं, असही जलील यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT