Sanjay Raut criticism Election Commission esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : शिवसेना तुमच्या बापाची आहे का? अर्वाच्य शब्दांत राऊतांची निवडणूक आयोगावर टीका

वसंतदादा पाटील, नाना पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा-जेव्हा मुंबईवर दिल्लीचं आक्रमण झालं, त्यावेळी ते शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

सकाळ डिजिटल टीम

आज सायंकाळी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरलीये. राऊतांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission) खालच्या शब्दांत टीका केलीये.

सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजप-शिवसेनेनं केली होती. यासाठी समितीही गठीत करण्यात आली, त्यामुळं राजकारण चांगलंच तापलंय.

त्यात आता संजय राऊतांनी 'चोरमंडळ' विधानावर स्पष्टीकरण दिलं. 'चोरमंडळ' विधानावरून राजकारण तापलं असताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुद्धा विरोधी पक्षांना देशद्रोही म्हटलं ना, त्यानंतर त्यांनी सारवासारव केली. मीही तेच म्हणालो, विधीमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल, असं काही विधान मी केलं नाही, असं स्पष्टीकरण राऊतांनी सकाळी कोल्हापुरात दिलं.

मात्र, आज दुपारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरलीये. राऊतांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission) खालच्या शब्दांत टीका केलीये. 'संघर्ष करणं हा शिवसैनिक आहे. उपाशी राहून घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं. शिवसैनिक इथंच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं, ते 50 खोके देवून पळून गेलेत.'

राऊत पुढं म्हणाले, निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची (एकनाथ शिंदे गट) आहे, तुमच्या बापाची आहे का? ही शिवसेना निवडणूक आयोगानं निर्माण केली का?, असा संतप्त सवाल राऊतांनी सांगलीतील कार्यक्रमात उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली.

भाजपनं पाठीत खंजीर खूपसलं

वसंतदादा पाटील, नाना पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा-जेव्हा मुंबईवर दिल्लीचं आक्रमण झालं, त्यावेळी ते शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. काँग्रेसचे मोठे नेते शिवसेनेच्या पाठिशी होते. भाजपनं पाठीत खंजीर खूपसले. हे भांडण आता 40 चोरांशी नाही, तर भाजपशीही आहे, असा इशाराही राऊतांनी दिला.

हक्कभंगाच्या नोटिसीवर काय म्हणाले?

नोटीस आली असेल, पण मी अजून पाहिली नाही. माझ्या हातात नोटीस पडली नाही. नोटीस जेव्हा मी घरी, कार्यालयात जाईन तेव्हा पाहीन. तसंच माझ्या हातात जर नोटीस आली असती तर ती मी उत्तर देऊ शकलो असतो. इतक्या घाईघाईनं कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही. तसंच मी माझी बाजू समर्थपणे मांडेन, असं देखील राऊतांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखल

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होणार? अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT