Sharad Pawar_Devendra Fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

"...तर शरद पवार आता काशीचा घाट दाखवतील"

फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शेलक्या शब्दांत टीका केली होती त्याला आता मलिकांनी उत्तर दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाष्य केलं आहे. यापूर्वीच शरद पवारांनी भाजपला कात्रजचा घाट दाखवलाय यापुढेही त्याचं असंच सुरु राहिलं तर काशीचा घाट दाखवतील, असं मलिक यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar has already shown Katraj Ghat to BJP now they will show Kashi Ghat says Nawab Malik)

मलिक म्हणाले, शरद पवार मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आलेले नाहीत. कालपर्यंत ज्यांच्या राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही पवारांवर फडणवीस भाष्य करत होते, त्यावेळी काय झालं? असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, शरद पवारांवर बोलणार्‍या देवेंद्र फडणवीसांना पवारांनी यापूर्वीच कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही ते बोलत राहिले तर त्यांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT