sharad pawar_fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

"पवार म्हणतात ते अर्धसत्य"; फडणवीसांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जे सांगितलं ते अर्धसत्य आहे, असा दावा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर भाष्य केलं. 

फडणवीस म्हणाले,  शरद पवार आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्याने त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. पण अशाच प्रकारे तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल आणि कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांच्या बदल्या झालेल्या नसतानाही त्यांनी पुराव्यांच्या आधारे गृहमंत्र्यालयात सुरु असलेल्या गैरप्रकारांबाबत अहवाल तयार केला होता आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्याचवेळी यासंदर्भात योग्य कारवाई झाली असतील तर आज ही वेळ आलीच नसती. 

सरकारची विश्वासार्हता संपली; आरोप करणारे परमबीर सिंग पहिले नाही

"पवारांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांनी दोष देणार नाही कारण या सरकारचे निर्माते ते आहेत. त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी त्यांची पाठराखण करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागते. त्यांनी ज्यावेळी सांगितलं की, एपीआय सचिन वाझे यांना परमबीर सिंग यांच्या कमिटीनेच पुन्हा पदावर घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी सर्वात महत्वाची जागा देण्यात आली. पण सरकार त्यावेळी झोपलं होतं का? कारण सस्पेंड असलेल्या व्यक्तीला पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्याला एक्स्झिक्युटिव्ह पोस्ट देता येत नाही हे सरकारला माहिती नव्हतं. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाहीत का?" असे सवालही यावेळी फडणवीस यांनी केले. तसेच माझं स्पष्ट मत आहे की पवार बोलतात ते अर्धसत्य आहे. कारण त्यांनी म्हटल्याप्रमाणं, परमबीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांचं सस्पेन्शन रद्द करुन त्यांना पदावर घेतलं हे खरंय. पण त्याच्या पुढचं वाक्य ते विसरले की, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानं आणि निर्देशानं हे काम परमबीर सिंग यांनी केलं आणि म्हणूनचं एपीआय दर्जाचा व्यक्ती त्याठिकाणी इतक्या महत्वाच्या पदावर गेला. या महत्वाच्या पदावर गेल्यानंतर त्यांनी काय केलं हे आपण सर्वांनी बघितलं," अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांवर हल्लाबोल केला. 

Breaking:'परम बीर सिंग यांनी माझी भेट घेतली होती'; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

सरकारला वाचवण्यासाठी शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये केवळ विंडो ट्रेसिंग झालं आणि सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न झाला. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि शरद पवार यांनाही सांगितल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का बोलत नाहीत? असा सवालही यावेळी फडणवीस यांनी केला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT