Eknath Shinde
Eknath Shinde esakal
महाराष्ट्र

माझी दोन्ही मुलं अपघातात गेली, तेव्हा दिघे साहेबांनी मला..; शिंदेंनी सांगितला कटू प्रसंग

सकाळ डिजिटल टीम

'तो माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता.'

मुंबई : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर (Dharmveer) या चित्रपटाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलरला दिग्गज उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे आणि धर्मवीर चित्रपटाबाबत (Dharmaveer movies) आपल्या भावना व्यक्त केल्या. आनंद दिघे हे ठाणेकरांचं हृदय होते. आनंद दिघेंनी अनेकांना जपलं, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आनंद दिघे यांच्याविषयी आपलं मत व्यक्त केलंय.

एकनाथ शिंदे म्हणाले, माझी दोन लहान मुलं अपघातामध्ये गेली तेव्हा मी पूर्णपणे कोलमडलो होतो. मात्र, आनंद दिघे साहेबांनी मला त्या काळात प्रचंड आधार दिला. त्यांनी मला पु्न्हा शिवसेनेसाठी काम करण्यासाठी राजी केलं. त्यावेळी आनंद दिघे माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. मी आज तुमच्यासमोर जो काही बसलोय तो फक्त आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

2000 मध्ये आयुष्यात घडलेल्या कटू प्रसंगाची आठवण शिंदेंनी सांगितली. ते म्हणाले, 'माझी दोन लहान मुलं दिपेश (वय ११) आणि शुभदा (वय ७) गावी बोटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा जीव गेला. तो माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. त्यावेळी श्रीकांतही अवघ्या १४ वर्षांचा होता. 2 जून 2000 मध्ये हा अपघात घडला. त्यानंतर मी पूर्णपणे खचून गेलो होता. त्यावेळी आनंद दिघे साहेब दर दिवसाआड माझ्या घरी यायचे. माझी विचारपूस करायचे, असंही त्यांनी सांगितलं. या समाजाला तुझी गरज आहे. तुझं कुटुंब इतकं छोटं नाही, मोठं कुटुंब आहे. तुला लोकांसाठी काम करायचं, असं दिघे साहेबांनी मला सांगितलं होतं.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहायचाय? मग, महाराष्ट्राच्या 'या' माऊंट एव्हरेस्टला नक्की द्या भेट

T20 WC 24 Team India : T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT