Ramdas Kadam v/s uddhav Thackeray matoshree Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam: "बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना संशय आहे का?"

कदमांनी आदित्य ठाकरेंना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटात गेलेले रामदास कदम यांनी काल ठाकरे कुटुंबीयांवर जहरी टीका केली आहे. बाळासाहेबांना वाटत असेल की सोनियांच्या नादी लागून आपला मुलगा बिघडला, असं विधान कदम यांनी केलं आहे. तसंच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्यावरही कदमांनी निशाणा साधला आहे.

रामदास कदम काल आपल्या दापोली इथल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे परिवारावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत, असंही कदम म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे की काय, अशा शब्दांत रामदास कदम यांनी टीका केली आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे आज असते, तर सोनिया गांधींच्या नादाला लागून आपला मुलगा बिघडला, असं विधान कदम यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले, "सारखं सांगतो, मी बाळासाहेबांचा मुलगा, हो मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो पण किती वेळा सांगशील? तुला काही संशय आहे का? किती वेळा सांगशील. अरे हो ना, आम्ही कुठे नाही म्हणालो. आम्ही कधी म्हणालो का तू बाळासाहेबांचा मुलगा नाहीस." रश्मी ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, "रश्मी वहिनी कुठेही गेल्या तरी व्यासपीठावर सोबतच. मला आश्चर्य वाटत त्या सगळीकडे कशा येतात? मांसाहेब कधी कुठे गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत."

आदित्य ठाकरेंना कदमांनी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. कदम म्हणाले, " त्याने पोराला सांगितलं पाहिजे आधी लग्न करुन बघ. बायको आली की मग संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय आहे. लग्न तर करुन बघ मग कळेल संसार काय असतो ते. मग खोके काय असतील ते कळेल ना."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT