Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sakal
महाराष्ट्र

बंडखोर आमदारांसाठी पुरेशी सुरक्षा तैनात; वळसे पाटलांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमिवर राज्याचील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे, यादरम्या बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यात निदर्शने करण्यात आली, काही आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड देखील करण्यात आली त्यांननंतर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा निर्माण झाला होता. यानंतर बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र सरकारकडे स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर बंडखोर आमदारांची सुरक्षा कोणत्याही क्षणी काढून घेतली नाही असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे, त्यांनी म्हटले आहे की, राज्यात आज कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही मोठी अनुचित घटना घडलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच वळसे यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची सुरक्षा कोणत्याही क्षणी काढून घेण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क आणि सज्ज आहेत. राज्याच्या विविध भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

केंद्र सरकारचीही सुरक्षा

अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड तसेच एकनाथ शिंदे आणि इतरही आमदारांच्या पोस्टरवर काळं ही फासण्यात आल्यानंतर याप्रकरणी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पत्र लिहिण्यापूर्वी केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेत शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला या आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT