dilip walse patil  Sakal media
महाराष्ट्र बातम्या

हजारो विद्यार्थ्यांना दिलासा; कोरोना काळातील गुन्हे गृह विभाग घेणार मागे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोना कालावधीमध्ये कलम 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याचं त्यांना सांगितलं आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यांमुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा विचार करता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. (Corona Lockdown)

दहा हजारांच्या आसपास या विद्यार्थ्यांची संख्या असल्याचं समजतंय. या संदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय की, कोरोना काळामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या काळात काही नागरीकांवर तसेच विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. हे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडला जाईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. (Dilip Walse Patil)

कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता या विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत आहे त्यामुळे गृह विभागाने त्यांचा विचार करुन हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अंमलबजावणीसाठी गृह खात्याने राज्यांतील 188 अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT