T. N. Sheshan esakal
महाराष्ट्र बातम्या

T. N. Sheshan : जेव्हा लालूंनी शेषन यांना रेड्यावर बसवून गंगेत धिंड काढण्याची धमकी दिली होती

उत्तर भारतात निवडणुकांतील हिंसाचार ही पहिल्यापासूनच मोठ्या चिंतेची बाब

सकाळ डिजिटल टीम

T. N. Sheshan : जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या देशात खऱ्या अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू झाले ते तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन उर्फ टी.एन. शेषन यांच्या कारकीर्दीपासून.

उत्तर भारतात निवडणुकांतील हिंसाचार ही पहिल्यापासूनच मोठ्या चिंतेची बाब होती. निवडणुकीत होणारा पैशाचा वारेमाप वापर, प्रचारातील गैरवापर, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतपेट्या पळवणे, मत मोजणीच्या वेळी अपेक्षित निकाल लागला नाही तर तेथे होणारा गोंधळ या सर्वांमुळे निवडणुका वादग्रस्त व्हायच्या.

पण या सगळ्याला चाप लावण्याचं काम केलं ते दहावे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी. तमिळनाडूत जन्मलेल्या या अधिकाऱ्याने भारतातील निवडणुकीची दिशाच बदलून टाकण्याचं धाडस दाखवलं. जे या आधी कुणीच दाखवलं नव्हतं.

टी एन शेषन यांनी 1995 च्या बिहार विधानसभा निवडणुकीपासून निवडणूक सुधारणा मोहिमेला सुरुवात केली. त्या काळात बिहारचे मतदान केंद्र लूट आणि हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध होते. शेषन यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली. तसेच, पहिल्यांदाच टप्प्याटप्प्याने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

1995 च्या विधानसभा निवडणुकीत लालू बिहारमध्ये दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात होते. विरोधी पक्षांनी लालूंवर निवडणुकीत अधिकार्‍यांशी संगनमत करून भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्याची शेषन यांनी गांभीर्याने दखल घेतली.

स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची स्मशानभूमी समजल्या जाणाऱ्या बिहारमध्ये शेषन यांनी आदर्श ठेवण्याचं ठरवलं. राज्यात पॅरा मिलिटरी फोर्स मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्या. पहिल्यांदाच अनेक टप्प्यांत निवडणुका झाल्या. शेषन यांनी विविध कारणांमुळे त्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा चार वेळा बदलल्या. त्यामुळे लालू प्रसाद यादव त्यांना आपल्या विजयाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मानू लागले. लालू आपल्या टिपिकल शैलीत शेषन यांच्यावर टीका करू लागले.

पत्रकार संकर्षण ठाकूर यांनी त्यांच्या 'द ब्रदर्स बिहारी' या पुस्तकात त्यावेळी काय काय घडलं याचा किस्सा लिहिलाय. निवडणुकीदरम्यान रोज सकाळी लालूंच्या निवासस्थानी ज्या अनौपचारिक बैठका व्हायच्या त्यात लालूंच्या संतापाच्या केंद्रस्थानी शेषन असायचे. अशाच एका सभेत ते म्हणाले होते, "शेषन पगला सांड जैसा कर रहा है। मालूम नहीं है कि हम रस्सा बांध के खटाल में बंद कर सकते हैं।

ठाकूर लिहितात की शेषन यांनी चौथ्यांदा निवडणूक पुढे ढकलल्यावर लालू यादव यांचा राग शिगेला पोहोचला होता. तेव्हा लालू स्वतः वेड्या बैलासारखे झाले होते. लालू यादव यांनी बिहारचे तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी आरजेएम पिल्लई यांना फोन करून झापलं होतं.

लालू म्हणाले, "पिल्लई, हम तुम्हारा चीफ मिनिस्टर और तुम हमारा अफसर। ई शेषनवां कहां से बीच में टपकता रहता है? ...फैक्‍स भेजता है। ...सब फैक्‍स-वैक्स उड़ा देंगे, इलेक्शन हो जाने दो।"संकर्षण ठाकूर यांनी लिहितात की, लालू यादव त्या काळात शेषन यांना त्यांच्याच शैलीत शिव्या द्यायचे.ते म्हणायचे, "'शेषनवा को भैंसिया पे चढ़ाकर गंगाजी में हेला देंगे।''निवडणुकीत लालू पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने उदयास आले.

बरं, बिहार विधानसभेची ती निवडणूक संपली. निवडणुकीचा निकाल लालू यादव यांच्या बाजूने लागला. पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने ते सत्तेवर आले. निवडणुकीत बूथ लुटणे वगैरे काही झालं नाही, आणि लालूंना त्याचाच फायदा झाला. त्यामुळे राज्यातील अगदी छोट्या भागातही त्यांचा संदेश पोहोचवण सोपं झालं होतं.

अर्थात शेषन यांना हे करताना प्रचंड विरोध झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुकीतील अमुलाग्र बदलांना विरोध केला. पण या गृहस्थाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीत सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहे, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी. एन. शेषन यांना जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT