Uddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs again Uddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs again
महाराष्ट्र बातम्या

अजूनही वेळ गेली नाहीये; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना शेवटचं आवाहन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बंड पुकारलेल्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे व बंड करणारे आमदार गुवाहाटीतूनच चर्चा करीत आहे. ते अद्याप मुंबईत परतलेले नाही. ते केव्हा येतील याची सर्वजण वाट पाहत आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना शेवटचे आवाहन केले आहे. (Uddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs again)

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमदारांना म्हणाले.

आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, असेही आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना (Shiv sena) पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

फेसबुक लाईव्हद्वारे केले होते आवाहन

एकनाथ शिंदेंसह आमदारांनी (MLA) बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला होता. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत परत येण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री मी नको असेल तर सांगा आजच राजीनामा देतो, असे ते म्हणाले होते. मात्र, तुम्ही परत या. आपण बसून चर्चा करू, असेही उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले होते.

बंडखोर आमदारांना शेवटची संधी

एकीकडे शिवसेनेचे आमदार व खासदार बंड पुकारलेल्या आमदारांना माफ करणार नाही, असे म्हणत आहे. तुम्ही खरेच शिवसैनिक असता तर मुंबई सोडली नसती असे म्हणत आहे. धमक्या देत आहेत. अपशब्द वापरत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. पक्षातील घाण साफ झाल्याचे सांगत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना शेवटची संधी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT