Congress-Ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

वंचितने घातली 'ही' अट; काँग्रेसकडून आघाडीचे पर्याय बंद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांत वंचित आघाडीला सोबत घेण्याचे पर्याय काँग्रेसकडून बंद करण्यात आले आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडीत नको, अशी अट घातल्याने काँग्रेसकडून आघाडीसाठीचे पर्याय बंद करण्यात आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.

भानुप्रताप बर्गेंचा निशाणा लागणार का?

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला होता. त्यामुळे काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न चालू होते, परंतु, प्रकाश आंबेडकरांकडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच बाहेर ठेवण्याची अट घालण्यात आल्याने आता काँग्रेसकडूनच वंचित आघाडीला सोबत घेण्याचे पर्याय बंद करण्यात आले आहेत.

अमृता फडणवीसांनी मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् सापडल्या वादाच्या भोवऱ्यात

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेली एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाची आघाडी विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत ही युती तुटली असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. तसेच, विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे, असे राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT