महाराष्ट्र

मतदार याद्यांतील घोळाबद्दल उच्च न्यायालयात याचिका 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांतील मतदार याद्यांत झालेल्या घोळामुळे लाखो मतदारांना मतदान करता आले नाही, असा आरोप करणारी जनहित याचिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

मुंबईसह ठाणे, पुणे व अन्य महापालिका निवडणुकांच्या वेळी सुमारे 14 लाख मतदारांची नावे गायब झाल्याचे उघड झाले होते. ही परिस्थिती राज्य निवडणूक आयोगाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. निवडणुकांची पूर्वतयारी वेळेवर केली असती आणि मतदार याद्यांबाबत जनजागृती मोहीम राबवली असती, तर असे प्रकार घडले नसते, असे याचिकादारांचे म्हणणे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मतदान केलेल्यांची नावे अचानक महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत गहाळ कशी होतात, असा सवाल याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. 2019 च्या निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनरावलोकन करावे आणि योग्य यादी तयार करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने एक समिती नेमून आपल्या शिफारशी आयोगाकडे सुपूर्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ऍड. सुहास ओक यांच्यामार्फत ही याचिका आव्हाड यांनी केली असून, लवकरच नियमित न्यायालयात याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT