Abhishek Bachchan, Aishwarya Rai-Bachchan Google
मनोरंजन

'ऐश्वर्या नसेल तर जेवण मिळणं मुश्किल' असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

'दसवी' सिनेमाच्या निमित्तानं अभिषेकनं ऐश्वर्या एक बायको म्हणून आपल्याला कसं सहकार्य करते याविषयी सांगितले आहे.

प्रणाली मोरे

अभिषेक बच्चनचा(Abhishek Bachchan) 'दसवी' (Dasvi) सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या निमित्तानं अनेक मुलाखती दिल्या,त्यावेळी तो ऐश्वर्या(Aishwarya Rai-bachchan) विषयी देखील भरभरुन बोलला आहे. आपल्या लाजाळू स्वभावामुळे आपण अनेकदा अनोळखी माणसांशी पटकन बोलत नाही किंवा आपल्याला बोलणं जमत नाही तेव्हा आपण कसे ऐश्वर्याला पुढं करतो याविषयी सांगताना त्यानं हॉटेलमधील एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला आहे,''हॉटेलमध्ये गेल्यावर मी जर तिथे वास्तव्यास असेल तर रुम सर्व्हिसला जेवणाची ऑर्डर कधीच फोनवर देत नाही. कारण मला ते जमत नाही. तेव्हा मी ते काम ऐश्वर्याला सांगतो. मग ती फोन करुन माझ्यासाठी ऑर्डर देते. जर ते शक्य झालं नाही काही कारणानं तर जेवतही नाही'' असं चक्क अभिषेक म्हणाला आहे.

अभिषेकनं याविषयी विस्तारितपणे सांगताना सांगितलं की, माझा स्वभाव थोडो लाजाळू आहे. खासकरुन जेव्हा अनोळखी माणसांशी संवाद साधायचा असेल तर मला ही अडचण अधिक सतावते. मी कधीच हॉटेलमध्ये रुम सर्व्हिसशी संवाद साधत नाही असंही तो म्हणाला. तो म्हणाला एखाद्या सिनेमाच्या प्रमोशनल कार्यक्रमावेळी कोणी स्वतःहून मला गाइड नाही केलं कुठे,कसं जायचंय याविषयी तर मी स्वतःहून जातही नाही विचारायला. का तर माझा हा लाजाळू स्वभाव. अभिषेक पुढे म्हणाला,सेटवरही वातावरण आनंदी नसेल,काही घडलं असेल तर मी सकारात्मक वातावरणाशिवाय कामही करु शकत नाही. मी खूप लाजाळू आहे. लोक यामुळे हसतात कधीकधी माझ्यावर. माझ्या सिनेमाच्या प्रमोशनचा कार्यक्रम असेल आणि तिथे माझ्या मदतीला जर कुणी नसेल तर मी काहीच करु शकत नाही. मला माझ्या अवतीभवती माणसं लागतात,जे मला मार्गदर्शन करतील.

''एकदा घरी गेल्यावर मी आणि ऐश्वर्या सहज बोलत बसलो होतो. ती मला माझा दिवस कसा गेला याविषयी विचारत होती. तेव्हा तिनं 'मी जेवलो का?' अशी चौकशी केली. तेव्हा मी नाही म्हणालो. तेव्हा तिनं मला खायला आणून दिलं आणि मी जेवलो. मी स्वतःहून रुम सर्व्हिसला कधीच फोन करत नाही,हे काम ऐश्वर्या करते,ती माझ्यासाठी जेवण ऑर्डर करते आणि मी जेवतो. मला अनोळखी माणसांसोबत प्रत्यक्ष आणि फोनवरही बोलता येत नाही'' असं अभिषेक म्हणाला. अभिषेकचा 'दसवी' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात यामी गौतम,निमरत कौर असे कलाकार आहेत. ७ एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटर आणि ओटीटी अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT