Actress Bhagyashree reveals that her filmy life changed after marriage
Actress Bhagyashree reveals that her filmy life changed after marriage esakal
मनोरंजन

चित्रपटाऐवजी सासरचं नातं जपलंय मी,भाग्यश्रीचा मोठा खुलासा

सकाळ ऑनलाईन टीम

भाग्यश्रीच्या सौदर्यानं कोणीही भारून जाईल एवढी सुंदर ही अभिनेत्री एवढा काळ चित्रपटांच्या दूर पडद्याआड असण्याचं काय कारण असावं असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल.भाग्यश्रीच्या पहिल्याच चित्रपटातून तीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.तीच्या त्या पहिल्या चित्रपटाचं एखादं गाणं जरी कानावर पडलं तरी भाग्यश्रीची प्रेक्षकांना आजही आठवण येते.मैने प्यार किया या चित्रपटानंतर भाग्यश्रीने प्रेक्षकांची मनं इतपत जिंकून घेतली होती की प्रेक्षकांना भाग्यश्री पुढील चित्रपटांत अपेक्षित होती.पण मात्र भाग्यश्रीचे लग्न झाले आणि तीचे संपूर्ण जीवनच बदलले.

एका मुलाखतीत बोलताना भाग्यश्री म्हणाली,माझं लग्न अशा घरात झालं ज्यांचा चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता.लग्न झाल्यानंतर मी सिनेमातली भाग्यश्री न राहता एका गृहिणीला जी कामं करावी लागतात,जसे सगळे सांभाळावे लागते तसेच माझेही आयुष्य झाले.अक्षरश: माझ्या घरच्यांना मी माझ्या चित्रपटातील जीवनाचे महत्व कधी समजवूच शकले नाही.त्यामुळे माझा सिनेसृष्टीतील वावर कमी होत गेला.तसेच भाग्यश्रीने बोलताना हे देखिल उघड केले की,तीच्या नवऱ्याला मी त्याला सोडून कोणाबरोबर रोमँटिक सिन्स करावे हेदेखिल पसंत नव्हते.त्यामुळे मग मी चित्रपट सोडून त्याच्या आणि माझ्या नात्याला महत्व दिले.

बऱ्याच काळानंतर आता मात्र भाग्यश्री सोशल मीडियावर अॅक्टिव दिसून येते.कंगनासोबत एका वेब सिरीजमधे अभिनय करताना सुद्धा ती दिसते.भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका या दोघांनीही तिच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय विश्वात प्रवेश केला आहे.अभिमन्यू अखेरचा मीनाक्षी सुंदरेश्वरमध्ये सान्या मल्होत्रासोबत दिसला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT