Amitabh bachchan Anushka Sharma bike ride without helmet -Update
Amitabh bachchan Anushka Sharma bike ride without helmet -Update  Google
मनोरंजन

विना हेल्मेट प्रवास केला म्हणून अनुष्काला १०,५०० तर अमिताभना फक्त १००० रु. दंड..असं का? जाणून घ्या यामागचं कारण..

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan Anushka Sharma Bike Ride: फिल्म स्टार्स सर्वसामान्य लोकांसाठी रोल मॉडेल असतात. हेच कारण आहे की सेलिब्रिटींच्या प्रत्येक हरकतीवर लोक नजर ठेवून असतात.

काही दिवसांपू्र्वी अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा दोघे हेल्मेट शिवाय बाइकची सवारी करताना दिसले आणि त्यांना पाहून लोक भडकले. थेट लोकांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.

दोन्ही प्रकरणात मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केल्याचं समोर आलं. पोलिसांनी ट्विटरवरनं या प्रकरणात दंड आकारल्याची माहिती दिली आहे. पण अनुष्का शर्मा प्रकरणात १०,५०० रुपयाचा दंड आकारला गेला आणि अमिताभ बच्चन प्रकरणात फक्त १००० रुपये आकारले गेले.(Amitabh bachchan Anushka Sharma bike ride without helmet mumbai traffiv police fine)

दोन्ही कलाकारांनी हेल्मेट न घालता प्रवास केल्यामुळे त्यांना दंड आकारला गेला होता. पण दंडाच्या रकमेत इतका फरक का होता. तर चला जाणून घेऊया की मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एकाला कमी आणि दुसऱ्याला जास्त दंड का आकारला.

मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या ट्वीटनुसार अमिताभ बच्चन प्रकरणात त्यांनी महाराष्ट्र व्हीकल अॅक्टच्या 129/194(D) सेक्शन अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात ५०० ते १००० रुपये दंड आकारला जातो. याव्यतिरिक्त ड्र्रायव्हरचं लायसन देखील तीन महिन्यासाठी रद्द केलं जातं.

अनुष्का शर्मा प्रकरणातही मुंबई ट्राफिक पोलिसांनी कारवाई केली. ट्वीटनुसार अनुष्काच्या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र व्हीकल अॅक्टच्या 129/194(D), सेक्शन 5/180 आणि सेक्शन 3(1) 181 अंतर्गत कारवाई केली आहे.

पोलिसांनी सेक्शन 3(1) 181 अंतर्गत लायसन्सशिवाय गाडी चालवली म्हणून ५ हजाराचा दंड आकारला.. सेक्शन 5/180 अंतर्गत पोलिसांनी गाडीच्या मालकावर लायसन्स नसलेल्या माणसाला गाडी चालवण्याची परवानगी दिल्यामुळे ५ हजार रुपयाचा दंड आकारला आणि 129/194(D) म्हणजे हेल्मेटशिवाय गाडी चालवली म्हणून ५०० रुपयाचा दंड आकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT