Anup Jalota On Azaan-Hanuman chalisa controversy Google
मनोरंजन

अजान-हनुमान चालिसा वादात भजन सम्राट अनुप जलोटा यांची उडी; म्हणाले...

अनुप जलोटा यांनी अजान-हनुमान चालिसा संदर्भात आवाजाची मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला आहे.

प्रणाली मोरे

हनुमना चालिसा(Hanuman chalisa) आणि अजान वाद(Azzan Controversy) हा इतका टोकाला गेलाय की यामुळे आता दंगल होतेय की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात भरली आहे. राजकीय नेते मंडळी,साधु-संत यांच्या या विषयावरील मत प्रदर्शनानंतर आता फिल्म इंडस्ट्रीनंही या वादात एन्ट्री केलेली दिसून आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी औरंगाबाद येथाील सभेत पुन्हा मशिदीवरील भोंगे काढून टाकण्यासाठी अल्टिमेटम दिलाय आणि तसं जर झालं नाही तर परिणाम वाईट होतील असं देखील म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय,''जर मशिदींवरील भोंगे काढून टाकले नाहीत तर मनसे कार्यकर्ता मशिदी बाहेर हनुमान चालिसा वाचायला लागतील. आणि यासाठी भोंग्याचीच मदत घेतली जाईल''. महाराज बालकदास यांनी देखील म्हटलं होतं की,'' जर अजान ऐकवण्यासाठी मशिदवर भोंगे लावले जातात तर मग हनुमान चालिसा ऐकवण्यासाठी भोंग्यांचा वापर का केला जाऊ नये''. आता या रंगलेल्या वादात भजन गायक अनुप जलोटा(Anup Jaltoa) यांनी देखील उडी घेत आपलं मत मांडलं आहे.

गोरखपूर येथील एका कार्यक्रमात अनुप जलोटा म्हणाले की, ''आमच्या इथे अजान आणि हनुमान चालिसा दोन्हींना संगीताच्या माध्यमातून सादर केलं जातं. हे दोन्ही देखील ऐकताना खूप श्रवणीय आहेत. जिथे अजानमध्ये संगीताचे सूर वास करुन आहेत तिथे कृष्णाच्या बासरीमधूनही मनमोहक सूर निघतातच की''. अनुप जलोटा पुढे म्हणाले आहेत,''अजान आणि हनुमान चालिसा दोघांचे आपलं असं एक महत्त्व आहे,पण हे ऐकवताना आवाजाची मर्यादा असावी''.

अनुप जलोटा म्हणाले आहेत,''मंदिर-मशिद किंवा मग गुरुद्वारा,चर्च काहीही असो,कुठेही देवाची आराधना मोठ्या आवाजात करू नये. कानांना तो आवाज मधुर वाटेल अन् ऐकणाऱ्याला त्याचा त्रास होणार नाही इथपत आवाजाची मर्यादा ठेवावी''. त्यांनी आपलं उदाहरण देताना म्हटलं आहे,''मला भजन गायला आवडतं. पण ते भजन जर मोठ्या आवाजात मी गायला लागलो तर लोकांना त्याचाही त्रास होणारच''.

अनुप जलोटा यांनी यु.पी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतूक केलं आहे. योगींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत गोरखपूरचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकल्यामुळे अनुप जलोटा यांनी त्यांचं कौतूक केलं. गेल्या ४० वर्षांपासून आपलं गोरखपूरशी जवळचं नातं राहिलं आहे. त्यामुळे आताचं बदललेलं गोरखपूर इतकं सुधारलं आहे की बाहेरून येणाऱ्याला ते ओळखताही येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT