aamir khan ,reena dutta
aamir khan ,reena dutta file image
मनोरंजन

किरण रावच्या आधी रिनाच्या प्रेमात वेडा होता आमिर; रक्ताने लिहिलं होतं प्रेमपत्र

प्रियांका कुलकर्णी, स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी १५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आमिरने किरण आधी रीना दत्तसोबत लग्न केले. रिनासोबत आमिरने 16 वर्ष संसार केला. दोघांना मुलगी इरा आणि मुलगा जुनैद ही दोन मुलं आहेत. जाणून घेऊयात रिना आणि आमिरच्या नात्याबद्दल काही खास गोष्टी ...(bollywood actor aamir khan reena dutta love story)

आमिर आणि रिनाची लव्ह स्टोरी

आमिर आणि रिनाची लव्ह स्टोरी ही अगदी फिल्मी स्टाईलने सुरू झाली. आमिर आणि रिना हे दोघे शेजारी राहात होते. दोघे कित्येक तास त्यांच्या घराच्या खिडकीमधून बोलत असत. आमिरने एका दिवशी धाडस करून रिनाबद्दल त्याचे प्रेम तिच्या समोर व्यक्त केले होते. पण रिनाने त्याला नकार दिला. आमिरने अनेक वेळा तिला प्रपोज केले पण रिना त्याला नेहमी नकारात्मक उत्तर देत असत. आमिरने जेव्हा रिनाबद्दलची सर्व आशा सोडली होता. तेव्हा रिनाने आमिरला होकार दिला होता. 1999 मध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये आमिरने सांगितले,'त्यावेळी मी माझ्या घराच्या खिडकीमध्ये नेहमी पेक्षा जास्त वेळ थांबत होतो. मी अनेक वेळी रिनाला तिच्याबद्दलच्या माझ्या भावना सांगायचा प्रयत्न केला पण ती उत्तर देत नव्हती, मी लवकर हार पत्करणारा मुलगा नव्हतो. दोन दिवसानंतर ती मला भेटली आणि तिने पुन्हा मला सांगितले की तिला माझ्याबद्दल कोणत्याच भावना नव्हत्या. त्यानंतर मी खिडकी जवळ बसणे टाळात होतो. माझ मन दुखावले होते. मी तिला विसरण्याचा प्रयत्न करत होतो.'

रिनाला रक्ताने लिहिलं होतं प्रेमपत्र

आमिर खानने रिनाला चक्क रक्ताने प्रेमपत्र लिहिलं होतं. रिनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना आमिरने प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि रिनाला इम्प्रेस करण्यासाठी रक्ताने प्रेमपत्र लिहिलं होतं. मात्र रिनाला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. पुन्हा असं कधीच करू नकोस, अशी सक्त ताकिद रिनाने आमिरला दिली होती.

'लगान'च्या निर्मितीसाठी रिनाने केली होती मदत

रिनाने आमिरच्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आमिरच्याच 'लगान' या चित्रपटाद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. निर्मितीसाठी आमिरने रिनाची मदत मागितली होती. तेव्हा रिनाने लगेच होकार कळवला. 'त्यावेळी चित्रपटांविषयी, निर्मितीविषयी तिला काहीच माहित नव्हतं. तरीसुद्धा ती माझ्यासाठी निर्मिती करायला तयार होती,' असं आमिर म्हणाला.

aamir khan ,reena dutta

घटस्फोटानंतरही आमिर-रिनाचं चांगलं नातं

आमिरच्या 'पानी फाऊंडेशन'साठी रिना काम करत असून ती या फाऊंडेशनची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. 'रिना ही व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. कधीकधी नाती टिकत नाहीत पण तिच्यासाठी माझ्या मनात खूप आदर आणि प्रेम आहे', असं आमिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सिझनमध्ये आमिरने हजेरी लावली होती. या चॅट शोमध्ये आमिर रिनाबद्दल म्हणाला, 'आम्ही १६ वर्षे एकत्र संसार केला. विभक्त होताना आमच्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी खूप त्रासदायक परिस्थिती होती. त्या परिस्थितीला आम्ही सामोरं गेलो पण त्यादरम्यान एकमेकांविषयीचं आदर अजिबात कमी झालं नाही. '

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT