Complaint filed in Bihar against four Bollywood stars
Complaint filed in Bihar against four Bollywood stars Google
मनोरंजन

'पानमसाला' प्रकरण कोर्टात पोहोचलं; शाहरुख,अजय सोबत अमिताभ,रणवीरही अडचणीत

प्रणाली मोरे

गुटखा आणि पान मसाला (Panmasala) सारख्या उत्पादनांची जाहिरात केल्या प्रकरणी बॉलीवूडच्या(Bollywood) बड्या-बड्या अभिनेत्यांना सोशल मीडियावर खूप कोसलं गेलं. आता या प्रकरणामुळे ४ बड्या स्टार्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan),रणवीर सिंग,शाहरुख खान(Shah rukh Khan),अजय देवगणच्या विरोधात पान मसाला आणि गुटखा अशा दोन्हींचं प्रमोशन करण्यासंदर्भात बिहारच्या(Bihar) एका कोर्टात केस(Court Case) दाखल केली आहे. ही केस मुजफ्फरपुरमध्ये सामाजिक कार्यकर्ता असलेली तमन्ना हाश्मीनं दाखल केली आहे. जाणून घ्या या पूर्ण प्रकरणाविषयी.

काही दिवसांपूर्वी या पानमसाला प्रकरणावरुन खूप मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर यामुळे बॉलीवूडच्या बड्या-बड्या कलाकारांवर चांगलेच ताशेरे ओढले गेले होते. खरंतर,जेव्हा अक्षय कुमार ही जाहिरात करताना दिसला तेव्हा या प्रकरणाला वादाचं स्वरुप मिळालं. अक्षयला तंबाखू उत्पादक कंपनीच्या पानमसाला प्रॉडक्टला प्रमोट करताना लोकांनी पाहिलं आणि जणू ते खवळलेच. अक्षयला खूप ऐकावं लागलं. त्यानंतर लगोलग त्यानं चाहत्यांची माफी मागत,जाहिरतीमधून काढता पाय घेतला. तसं त्यानं सोशल मीडियावरच जाहिर करून टाकलं. तसंच,जाहिरातीसाठी जे पैसे त्यानं घेतले आहेत ते सगळे तो दान करणार असल्याचंही जाहिर करुन टाकलं. तर दुसरीकडे शाहरुख,अजय देवगणही या पानमसाल्याची जाहिरात करतात ती देखील चर्चेत आली होती.

अमिताभ बच्चन देखील एका तंबाखू उत्पादन कंपनीच्या प्रॉडक्टला प्रमोट करीत होते. अर्थात आता कळत आहे की गेल्या वर्षीच त्या कंपनीसोबतचा त्यांचा करार संपला आहे. त्यानंतर त्यांनी अधिकृतरित्या एक निवेदन सादर करुन यासंदर्भात माहिती देखील दिली होती. पण असं असलं तरी त्यांच्या डोक्यावरही टांगती तलवार अजून आहेच असं दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तमन्ना हाश्मिनं रणवीर सिंग,अजय देवगण,शाहरुख खान आणि अमिताभ यांच्या विरोधात सेक्शन ४६७,४६८,४३९ आणि १२० B अंतर्गत केस दाखल केली आहे.

चार्जशीटमध्ये या चारही कलाकारांवर पैशांच्या लालसेपोटी आपल्या प्रसिद्धिचा गैरवापर करण्याचा आरोप लावला गेला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार,या केसची सुनावणी आता २७ मे रोजी होईल. तमन्ना हाश्मीचं म्हणणं आहे की,हे चारही कलाकार आपल्या प्रसिद्धिचा गैरवापर करीत आहे. लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सारेच त्यांना फॉलो करतात. तर अशा पद्धतीनं शरीरासाठी हानिकारक असललेल्या उत्पादनाची जाहिरात करून ते लोकांचं आयुष्य धोक्यात आणू शकत नाहीत. तमन्नाच्या म्हणण्यानुसार,या कलाकारांनी जर अशा उत्पादनाची जाहिरात केली तर याचा लहान मुलांवर सर्वात अधिक परिणाम होईलआणि ते देखील याचं सेवन खूप लहान वयात करायला सुरुवात करू शकतात. आणि म्हणूनच आपण ही केस दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT