Lata Mangeshkar Esakal
मनोरंजन

'ऐ मेरे वतन के लोगों' गाण्यास लतादीदींनी दिला होता नकार,कारण...

Ae Mere Watan Ke Logon: सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर गाण्यांपैकी एक असणारं गाणं 'ऐ मेरे वतन के लोगों' गाण्यासाठी लतादीदींनी नकार दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

Lata Mangeshkar: कवी प्रदीप (Pradeep) यांनी लिहिलेलं हे अलौकिक गाणं (Song) त्यांनी आपली बहीण आशा भोसलेंसह (Aasha Bhosale) 'ड्यूएट' रेकॉर्ड करावं, अशी लतादीदींची (Lata Mangeshkar) इच्छा होती. परंतु कवी प्रदीपजींनुसार लता दीदींच्या आवाजात जी भावना आहे ती इतर कोणालाही जमणार नाही, म्हणून ते गाणं फक्त लता दीदींनीच रेकॉर्ड करावं असं प्रदीपजींचं ठाम मत होतं. त्यामुळे आशा भोसलेंनी या प्रोजेक्ट मधून माघार घेतली. अहोरात्र काम करत असताना एका गाण्याकडे विशेष लक्ष देणं अशक्य वाटतं, असं सांगत लतादीदींनीही गाण्यास नकार दिला. (Lata Mangeshkar refused to sing 'Ae Mere Watan Ke Logon')

संगीतकार-गायक हेमंत कुमार (Hemant Kumar) यांनी खरंतर संपूर्ण 'ऐ मेरे वतन के लोगों' हा प्रोजेक्ट तयार केला होता. त्यांनीच लता दीदींना हे गाणं गाण्यासाठी तयार केले. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर काही काळातच लिहिलेल्या या ऐतिहासिक गीताने जनतेला एकत्र आणण्याची विलक्षण कामगिरी केली. दीदींनी हे गाणं गातेवेळची त्यांची मनस्थिती व्यक्त करताना काही गोष्टींचा खुलासा केला होता.

दीदी म्हणाल्या की, " हे गाणं कोणत्याही चित्रपटाचा भाग नसल्यामुळे त्याचा परिणाम मर्यादितच होईल असं मला वाटलं होतं, परंतु 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गीत माझं 'सिग्नेचर ट्यून'च बनलं. जोपर्यंत मी ते गात नाही तोपर्यंत माझा कोणताही कार्यक्रम, मैफिल पूर्ण होत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT