Nikkita Ghag Esakal
मनोरंजन

Nikita Ghag: अभिनेत्रीनं परत केला दादा साहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड..म्हणाली, 'हा तर'

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपुर्वी मुंबईमध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' पार पडला.या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आलिया भट्ट, वरुण धवन, रणबीर कपुर अशा अनेक कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला.

मात्र हा पुरस्कार शासनाकडून दिला जातो असा अनेकांचा समज आहे. मुळात तसं नसून हा पुरस्कार एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. या पुरस्कार सोहळ्यानंतर बरेच वाद झाले.

आता त्यातच मॉडेल निकिता घाघ ही दादासाहेब फाळके यांच्या नावाप्रमाणेच असणाऱ्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड शो विरोधात बोलली आहे . गेल्या वर्षी मिळालेला पुरस्कार तिनं परत करण्याची घोषणा केली आहे. निकिता घाग इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. त्याच्या व्यक्तिरेखेनुसार तिला 2021 मध्येही हा पुरस्कार देण्यात आला होता.

एका वेबसाइटशी बोलताना निकिता घाग म्हणाली की, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी हा पुरस्कार परत करावा. हा खोटा पुरस्कार असून यामुळं खऱ्या पुरस्काराचे पावित्र त्यामुळं जपले जात नसल्याचं तिनं सांगितलं.

निकिता घागने सांगितले की, भारत सरकार चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके यांच्या नावाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या रूपात करते हे माझ्यासारख्या अनेक नव्या कलाकारांना माहीत नाही. त्यामुळं या पुरस्कारासारख्या समान नावांच्या पुरस्कारावर बंदी घालण्याची मागणीही मी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तिने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलनंतर LPG दर वाढणार का? देशात इंधनाचा किती साठा शिल्लक? सरकारने संपूर्ण आकडाच सांगितला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Kalyan: क्रूरतेची सीमा गाठली! भटक्या कुत्र्यांना मारून नाल्यात फेकलं, केडीएमसीच्या कंत्राटदाराचं कृत्य

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

SCROLL FOR NEXT