Bharat Jadhav  esakal
मनोरंजन

Natya Mahotsav : चित्रपटात काम करताना मर्यादा येतात, पण..; काय म्हणाले अभिनेते भरत जाधव?

नाट्यचळवळ ही चळवळच आहे. त्या चळवळीला दिशा देण्यापेक्षा नाटकाला लोक कशी येतील, यावर फोकस ठेवून काम झाले पाहिजे.

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : नाटक थेट लोकांच्या मनाशी भिडते, त्यामुळे नाटकं श्रेष्ठच आहेत. नाटक पाहायला येणाऱ्यांची गर्दी कशी वाढेल, ही चळवळ महत्त्वाची आहे. त्या चळवळीला ताकद देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने आयोजिलेला नाट्यमहोत्सवही तितकाच महत्त्वाचा अन् प्रशंसनीय आहे. त्यामुळे चळवळीला निश्‍चित उभारी मिळेल, असा विश्‍वास ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव (Actor Bharat Jadhav) यांनी व्यक्त केला.

दै. ‘सकाळ’तर्फे येथे आयोजित नाट्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘सकाळ कॉफी विथ कलाकार’ कार्यक्रम येथे झाला. त्यात अभिनेते जाधव बोलत होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, अभिनेते कमलाकर सातपुते, ऐश्‍वर्या शिंदे, चितळे डेअरीचे मार्केटिंगचे प्रमुख निवास गुरव, शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटीचे संदीप डाकवे, यशवंत बँकेचे शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, ‘‘नाट्यचळवळ ही चळवळच आहे. त्या चळवळीला दिशा देण्यापेक्षा नाटकाला लोक कशी येतील, यावर फोकस ठेवून काम झाले पाहिजे. त्यासाठी ती चळवळ महत्त्वाची आहे. ‘सकाळ’ माध्यम समूह ज्या पद्धतीने त्यासाठी उभा राहिले आहे, तेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘सकाळ’सोबत प्रायोजक आले आहेत, त्यांनीही दिलेली साथही महत्त्वाची आहे.

सकाळ नाट्यमहोत्सवामुळे वातावरणनिर्मिती झाली आहे. त्याचा अनुभव कोल्हापूर व सांगली येथे घेतला आहे. त्यामुळे नाट्यमहोत्सव यशस्वी होतो आहे. अभिनयात आपले काम आपण फोकस केले पाहिजे. काम करत करत आपला फोकस यशस्वी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. चित्रपटांपेक्षा नाटक अधिक ताकदीचे प्रभावी माध्यम आहे.'

'नाटकात थेट अभिनय आहे, तो प्रेक्षकांशी भिडतो. त्यामुळे नाटक बरंच काही शिकवून जाते. चित्रपटाच्या मर्यादा स्पष्ट आहेत. त्याउलट नाटकात वेगळेपणाही जपता येतो. नाटकांमध्ये संहितेच्या पातळीवर बदल होतो आहे. मात्र, रंगमंचावरील बदलासाठी तेवढा प्रेक्षकवर्ग अपेक्षित आहे. तो मिळत नाही. देशात मराठी रंगभूमी ताकदीचीच आहे. त्यानंतर बंगालच्या रंगभूमीचा उल्लेख होतो.'

जाधव म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडेंपासून वि. वा. शिरवाडकरांसह आत्तापर्यंत अनेक ताकदीचे लेखक झाले आहेत. त्यांची नाटकं अजरामर झाली आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होत आहे. नव्या लेखकांची व कलाकारांचीही होणारी वाढ महत्त्वाची आहे. अनेक नाटकांत तांत्रिक बदल झाले आहेत. मात्र, तरी अभियानाच्या बाबतीत मराठी रंगभूमीच उजवी ठरते. त्यामुळे रंगमंचावर सादरीकरण करताना खूप समाधान मिळते.

'तरुण पिढी नाटक बघायला येते आहे. मात्र, संहिता व त्यांची अभिरुची तितकीच महत्त्वाची आहे. सोशल मीडियासह अनेक माध्यमे खुली असली तरी त्यांच्या खुल्यापणावर मर्यादा आहेत. काही काळाने त्याचा कंटाळा येतो. त्यामुळे नाटकाकडे वळण्याचा प्रवाह कायम वाढता आहे. तो कमी-जास्त होतो आहे, त्यालाही बरीच कारणे आहेत. नाटकाला कित्येक वर्षांची परंपरा आहे. चित्रपटात काम करताना मर्यादा आहेत. त्यामुळे नाटकांची पूर्वापार चालत आलेली परंपरा कायम राहण्यासाठी रसिक येतातच. नवा रसिक नाटकाकडे येतो आहे.'

भरत जाधव, अंकुश चौधरी व केदार शिंदे याची मैत्री निश्‍चित आहे. नाटकावरून आमच्यात वैचारिक चर्चा होते. ती व्हावी, त्याशिवाय प्रगती नाही. ग्रुपने किती ताकदीने विषय मांडता, यावर त्याचे सादरीकरण अवलंबून असते. तोच प्रयत्न आम्ही करतो. सध्या अनेक माध्यमे असल्याने नवी पिढी त्यात रमत असली तरी त्याही माध्यमांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. त्यामुळे त्यानंतर तीच युवा पिढी नाटकांकडे वळते आहे, असेच दिसते, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT