मनोरंजन

'पुरुषाला प्रश्न विचारले जात नाहीत', का चिडली समंथा?

युगंधर ताजणे

दाक्षिणात्य (south actress) लोकप्रिय जोडी समंथा (actress samantha) रुथ प्रभुचा पती नागा चैतन्यशी (naga chaitanya) नुकताच घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी घटस्फोटांची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. त्यांच्या निर्णयामुळे त्यांचे चाहते अत्यंत नाराज झाले आहेत. घटस्फोटाची बातमी सांगितल्यानंतर समांथाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. पण आता समांथाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. समांथाने इन्स्टाग्राम स्टोरीत एक कोट (Quote) शेअर केला. त्यामधे, “शुभ सकाळ, जेव्हा महिलांशी संबंधित एखादा मुद्दा असतो, तेव्हा त्यावर नैतिकदृष्ट्या प्रश्न उपस्थित केले जातात, पण तेच जर एखाद्या पुरुषाने केलं तर त्यावर काहीच प्रश्न विचारले जात नाहीत. एक समाज म्हणून आपल्याकडे ती नैतिकता नाहिए,” असे कोट(Quote) समांथाने शेअर केले आहे.

गेल्या महिन्यात समंथा आणि नागा चैतन्य यांनी विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. जेव्हा नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाची घोषणा समांथाने केली होती तेव्हा तिनं लिहिलं होतं की, आमच्या नात्याचा विचार करणाऱ्या सर्व माझ्या हितचिंतकांना सांगू इच्छिते, आम्ही आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षांपासून असणारी माझी मैत्री आणि प्रेम यापासून आता आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.त्या दोघांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांचे चाहते नाराज झाले होते. समंथा आणि नागा चैतन्य हे २०१० मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. त्या दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले. समांथा आणि नागा चैतन्य यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

दरम्यान, समंथाने फॅमिली मॅन २ या वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर नागा चैतन्य आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच नागा चैतन्य चा साई पल्लवी सोबत लव स्टोरी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हाकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT