मराठवाडा

जायकवाडी धरण 100 टक्‍के भरले

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - जायकवाडी धरण प्रकल्पाने शुक्रवारी सकाळी शंभर टक्‍क्‍यांची पातळी गाठली आहे. त्यामुळे पाण्याची आवक सुरू राहिल्यास गोदावरीच्या पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली.

जायकवाडीतील पाणीसाठा 99.23 टक्‍क्‍यांवर गेल्यानंतर ती पातळी कायम ठेवून उर्ध्व भागातून येणारे पाणी थेट गोदापात्रात व परभणी जिल्ह्याच्या मागणीनुसार डाव्या कालव्यातून व माजलगाव प्रकल्पासाठी उजव्या कालव्यातून सोडण्यात येत होते. गोदावरीच्या पात्रात जवळपास 40 दलघमी पाण्याचा विसर्ग केल्यानंतर प्रकल्पाचे उघडण्यात आलेले 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. आज सकाळी जायकवाडी धरणातील पाणीसाठा 2 हजार 909.041 दलघमीवर पोचला. त्यापैकी जिवंत पाणीसाठा 2 हजार 170.935 दलघमी झाल्याने प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT