Farmers strike
Farmers strike 
मराठवाडा

औरंगाबाद बाजार समितीतील व्यवहार ठप्प

शेखलाल शेख

औरंगाबाद - संपामुळे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळभाजीपाला मार्केट पुर्णपुणे ठप्प झाले असून सकाळी काही प्रमाणात दुकाना उघडल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मराठा संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे फळभाजीपालासह, धान्य यार्डातील मार्केट शंभर टक्के बंद झाले. 

औरंगाबाद शहराला फळ, भाजीपाला, धान्यांचा औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधूनच पुरवठा होता. संप असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला आणलाच नव्हता मात्र सकाळच्या सत्रात काही प्रमाणात भाजीपाला विक्री होत असल्याची माहिती मिळताच कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे, मराठा संघटनांचे माणिक शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी बाजार समिती येऊन सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे जे ग्राहक खरेदीसाठी बाजारात आले होत त्यांना माघारी जावे लागले. 

धान्य मार्केट ही बंद 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणात आवक, विक्री होत मात्र संप असल्याने धान्याच्या गाड्या आल्याच नाहीत. संपामुळे धान्य मार्केट यार्डाला कुलुप लावण्यात आले होते. 

शहरात किरकोळ बाजारात भाज्या मिळेना 
बाजार समिती मध्ये भाजीपाल्याची आवक झालेली नसल्याने शहरातील सर्वच किरकोळ भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची टंचाई जाणवण्यास सुरवात झाली आहे. कोणत्या ही भाज्यांची जुडी दहा रुपयांच्या पुढे आहे. भाज्याच नसल्याने मेथीची, कोंथबीरची जुडी पंधरा ते वीस रुपयांना विक्री होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT