Jayakwadi dam
Jayakwadi dam 
मराठवाडा

जायकवाडी धरणातून पुन्हा पाणी सोडणार

चंद्रकांत तारू

पैठण (जि. औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरण आज (शुक्रवार) शंभर टक्के भरल्यामुळे धरणातुन पुन्हा गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची शक्यता धरण प्रशासनाच्या सुत्रांनी व्यक्त केली.

पाण्याची आवक यापेक्षा अधिक वाढल्यास हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे  सुत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता. २१) धरणाची पाणी पातळी ९८ टक्के झाल्यामुळे धरणाच्या एकुण २७ पैकी १८ दरवाजे उघडून गोदापात्रात पाणी सोडण्यात आले होते.  

धरणातून एकूण १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दोन दिवसाच्या काळात सोडण्यात आला. आता पुन्हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा ओघ वाढला असल्यामुळे पुन्हा पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, धरणात तीन हजार ६०० क्युसेक पाण्याची आवक असून, धरणाची पाणी पातळी १०० टक्के झाली असल्याची माहिती धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT