Ambadas Danve Allegation On BJP Rally In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणले, अंबादास दानवेंचा भाजपवर आरोप

आज भाजपच्या वतीने औरंगाबाद येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : हा मोर्चा अपयशी ठरला आहे. पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणलं आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. आज सोमवारी (ता.२३) भाजपच्या वतीने औरंगाबाद (Aurangabad) येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर दानवे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, पैसे देऊन महिलांना जल आक्रोश मोर्चा आणले असून मी तुम्हाला व्हिडिओ देतो. (Ambadas Danve Allegation On BJP For Giving Money To Peoples For Rally Participation In Aurangabad)

या मोर्चा प्रसंगी भाजप व शिवसेना यांचा वाद पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांनी सेनेचे बॅनर फाडल्याचे दिसले. राज्यात व केंद्रात सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचा पाणीप्रश्न का सोडवला नाही, असा सवाल शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. हा पाणी मोर्चा नसून राजकीय मोर्चा असल्याची टीका त्यांनी केली.

खैरे तुम्ही समांतर योजना खांद्यावरुन खाली येऊ द्या. ती चालू लागेल. मात्र ती आवळून धरली, असा टोला आमदार हरिभाऊ बागडे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लगावला. सगळं शहर पाणी-पाणी मागत आहे. अंगावर आलो तर शिंगावर घेऊ, अरे तुम्हाला शिंग राहिले तरी कुठे ? आता तुम्ही बोडखे झाला आहात. खैरे डोक्यावर हात लावून पाहा, शिंगे राहिली की नाही?, असा सवाल त्यांनी केला. हिंदुत्वाची उठा ठेव शिवसेनेने करु नये. आज देखील कार्यकर्त्यांची कामे बंद आहेत. हा आक्रोश मोर्चा, संघर्ष मोर्चा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बागडे यांनी शिवसेनेला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT