Ambadas Danve Allegation On BJP Rally In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणले, अंबादास दानवेंचा भाजपवर आरोप

आज भाजपच्या वतीने औरंगाबाद येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : हा मोर्चा अपयशी ठरला आहे. पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणलं आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. आज सोमवारी (ता.२३) भाजपच्या वतीने औरंगाबाद (Aurangabad) येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर दानवे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, पैसे देऊन महिलांना जल आक्रोश मोर्चा आणले असून मी तुम्हाला व्हिडिओ देतो. (Ambadas Danve Allegation On BJP For Giving Money To Peoples For Rally Participation In Aurangabad)

या मोर्चा प्रसंगी भाजप व शिवसेना यांचा वाद पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांनी सेनेचे बॅनर फाडल्याचे दिसले. राज्यात व केंद्रात सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचा पाणीप्रश्न का सोडवला नाही, असा सवाल शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. हा पाणी मोर्चा नसून राजकीय मोर्चा असल्याची टीका त्यांनी केली.

खैरे तुम्ही समांतर योजना खांद्यावरुन खाली येऊ द्या. ती चालू लागेल. मात्र ती आवळून धरली, असा टोला आमदार हरिभाऊ बागडे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लगावला. सगळं शहर पाणी-पाणी मागत आहे. अंगावर आलो तर शिंगावर घेऊ, अरे तुम्हाला शिंग राहिले तरी कुठे ? आता तुम्ही बोडखे झाला आहात. खैरे डोक्यावर हात लावून पाहा, शिंगे राहिली की नाही?, असा सवाल त्यांनी केला. हिंदुत्वाची उठा ठेव शिवसेनेने करु नये. आज देखील कार्यकर्त्यांची कामे बंद आहेत. हा आक्रोश मोर्चा, संघर्ष मोर्चा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बागडे यांनी शिवसेनेला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT