औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यात शहरातील काही वसाहतींमध्ये वारंवार रुग्ण आढळून येत असून, अशा वसाहतींची संख्या १३ एवढी आहे. आत्तापर्यंतच विचार केला असता, रुग्णसंख्या सुमारे चारशेपर्यंत गेली आहे.
शहरात कोरोना संसर्ग कमी होत असतानाच दसरा व दिवाळीचे सण आले. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. ही गर्दी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. ५० ते ६० वर आलेली रुग्ण संख्या पुन्हा शंभरपेक्षा जास्त झाली होती. दरम्यान, शासनाने दुसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. त्यात दिल्लीसह इतर चार राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना रूग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. कोरोना संसर्गाच्या सुरवातीच्या काळातील १३ वसाहतींतच रूग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे.
या आहेत वसाहती
वसाहती एकूण रूग्ण मृत्यु बरे झालेले उपचार घेणारे
(संपादन-गणेश पिटेकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.