Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादचे 'संभाजीनगर' करा : आता मनसेची मागणी

जगदीश पानसरे

औरंगाबाद : एप्रिल महिन्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. १९८८मध्ये शिवसेनेने औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करा, अशी मागणी केली. या मागणीला हिंदू मतदारांचा चांगला पाठिंबा मिळाला आणि शिवसेना सत्तेत आली. गेल्या ३० वर्षांत हे नामांतर काही झाले नाही. आता तर शिवसेनेनेच कॉंग्रेसशी युती केली. त्यामुळे हा मुद्दा मनसेने हायजॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. 

महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत गाजणारा औरंगाबादच्या 'संभाजीनगर' नामकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरेल, असा विरोधकांचा कयास आहे. त्यामुळेच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मनसे आमदार राजू पाटील यांनी संभाजीनगर नामकरणासाठी  मनसे प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

हा मुद्दा आता राज ठाकरेच लावून धरतील

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 13 तारखेपासून औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील, अभिजीत पानसे यांच्यासह काही नेते काल शहरात दाखल झाले. पक्षाच्या बैठकीनंतर आमदार राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा काढला.

राजू पाटील म्हणाले, 2014 मध्ये केंद्रात आणि राज्याच्या सत्तेत शिवसेना सहभागी होती. शहराच्या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकार करते. शिवसेनेने तसा प्रस्ताव केंद्राकडे देऊन पाठपुरावा करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी केवळ स्वतःच्या राजकारणासाठी याचा वापर केला. आता तर शिवसेनेला औरंगाबादचे संभाजीनगर करणे शक्यच नाही. हा मुद्दा आता राज ठाकरेच लावून धरतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT