section 144 
छत्रपती संभाजीनगर

समजुन घ्या जमावबंदी आणि संचारबंदीतला फरक ..

मनोज साखरे

औरंगाबाद ः कोरोना विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव वाढत असून, देशपातळीवर मोठ्या उपाययोजना सुरू आहेत. त्याच धर्तीवर राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. २२) लागू केले; परंतु काहीजणांचा संचारबंदी लागू करण्यात आली, असा समज होत आहे.

पण ही केवळ जमावबंदी आहे, संचारबंदी नव्हे. जमावबंदीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक जमू नयेत आणि त्यांनी एकत्रितरीत्या फिरू नये, असे आवाहन पोलिस करीत आहेत. 

जमावबंदी म्हणजे काय? 

  • स्थानिक पातळीवर पोलिस वेळोवेळी जमावबंदीचे आदेश देऊ शकतात. 
  • जमावबंदीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायला नको. त्यांनी एकत्रित फिरायला नको. 
  • पाचपेक्षा अधिक लोक जर एकत्रित येत असतील तर अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ शकते. 
  • पाच किंवा अधिक लोक एकत्रित येऊन एखादा कार्यक्रम घेऊ शकत नाहीत किंवा कोणताही इव्हेंट ते आयोजित करू शकत नाहीत. एवढेच काय, तर लग्नकार्यही करता येत नाही. हेसुद्धा जमावबंदीचे उल्लंघन समजण्यात येते. 
  • जमावबंदीमध्ये कुणीही एकट्या-दुकट्या व्यक्तीला बाहेर जाऊन काही वस्तू किंवा साहित्य आणण्याची मुभा असते अथवा रुग्णालयासंबंधित महत्त्वाची काही कामे असतील तर ती करता येतात. 
  • पाचपेक्षा कमी लोक, एखादी व्यक्ती बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अडविले असेल तर त्यांनी आपण बाहेर पडण्याचे कारण सांगितले पाहिजे. विशेष म्हणजे ते कारण ठोस असावे, असेही पोलिस विभागाकडून सांगण्यात आले आहे. 


घाबरून जाऊ नका 
जीवनावश्यक वस्तूंसंबंधी उदाहरणार्थ दूध, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू आपणास खरेदी करण्यासाठी दुकाने उघडी असतील. जमावबंदीमध्येही आपण जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानावर जाऊ शकता. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर अशावेळी एकाच व्यक्तीने खरेदीसाठी जाणे सोयीस्कर ठरेल. त्यामुळे गर्दीही टाळता येईल. 

हेही वाचा  - पुण्यात सन्नाटा

जमावबंदी आणि संचारबंदी यातला फरक 
जमावबंदीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी नागरिकांना संचार करता येतो; मात्र संचारबंदीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याचीही मुभा नसते. संचारबंदी ही त्या-त्या क्षेत्रात जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त लागू करतात. संचारबंदी लागू केली गेली अशी जर अफवा येत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

हे महत्त्वाचे... 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा आयुष्याशी निगडित आहे. विरोध म्हणून, बेफिकिरी करून चालणार नाही. पूर्वग्रह अथवा फाजील आत्मविश्‍वास दाखवून वेगळे काही करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका. 
 

हेही वाचा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT