0Train1_11 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम होणार लवकर पूर्ण

ई सकाळ टीम

औरंगाबाद : खूप वर्षांपासून मागणी असलेल्या औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वेप्रशासनाकडून सकारात्मक पाऊल टाकल्याचे दिसत असून त्याच्या कामाला मंजूर मिळाली आहे. दिवाळी नंतर सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. महाराष्ट्र रेल पायाभूत विकास महामंडळातर्फे(एमआरआयडीसी) हे काम केले जाणार आहे. एमआरआयडीसी महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या दोन मार्गाचाही डीपीआर तयार करून मंजुरीसाठी रेल्वे मंडळ आणि राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांना एमआरआयडीसीने एका पत्राद्वारे ही माहिती दिली. रोटेगाव-कोपरगाव या मार्गाची २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. पूर्वी रोटगाव-पुणतांबा या मार्गाची मागणी केली जात होती. परंतु, या मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे रोटेगाव-कोपरगाव अशा ३५ किलोमीटर मार्गाचा पर्याय मांडण्यात आला. त्यास मंजुरीही मिळाली. परंतु, हा मार्ग सर्वेक्षणाच्या पुढे जात नसल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद-चाळीसगाव मार्गाचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्ग झाल्यास कमी वेळेत प्रवास करणे शक्य होईल. सर्वेक्षणातच हा मार्ग शक्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एका वृत्तपत्राला बोलताना म्हणाले, राज्य व केंद्र या दोघांचा समान वाटा नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी असेल.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

मोठी बातमी! लोकअदालतीत तडजोडीतून निकाली निघाली १०१ कोटींची प्रकरणे; १०-१२ वर्षांपासून माहेरी असलेल्या विवाहिताही गेल्या नांदायला सासरी

SCROLL FOR NEXT