Bhagwat Karad esakal
छत्रपती संभाजीनगर

महाविकास आघाडी सरकार हे बहिरे आहे, भागवत कराड यांचे टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकार हे बहिरे

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : २०१९ नंतर महाविकास आघाडी सरकार आले.त्यांनी दोन दिवसानंतर येणारं पाणी आठ दिवसांवर केले, अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी राज्य सरकारवर केली. आज सोमवारी (ता.२३) औरंगाबाद (Aurangabad) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. कराड पुढे म्हणाले, माझ्या माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. टँकर कोणाचे ? याचे संशोधन महापालिका प्रशासनाने करावे. १६०० कोटी रुपयांची पाणी योजना केली. या महानगरपालिकेकडे वीजबील भरण्यासाठी पैसे नाहीत. मग पाण्यासाठी पैसे कुठून आणणार ?, असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला. (Bhagwat Karad Attacks On Mahavikas Aghadi Government For Water Shortage In Aurangabad)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी जल वाहिनींचे भूमिपूजन केले. पण त्याचे काम पूर्ण झाले नाही. दीड वर्षामध्ये सात टक्केही काम पूर्ण झाले नाही. शिवसेना पाण्याच्या योजनेकडे दुर्लक्ष करित आहे. म्हणून जल आक्रोश मोर्चा आम्ही काढला. महाविकास आघाडी सरकार हे बहिरे झाले आहे. त्यांना ऐकू येत नाही, असा टोला कराड यांनी लगावला.

हे आपलं पहिल आंदोलन आहे. शासन व प्रशासन जागे झाले नाहीतर वारंवार आंदोलने करावे लागेल. या शहरावर तुमचे नेहमी प्रेम असते. ज्या वेळी कचऱ्याचा प्रश्न होता. आपल्या नेतृत्वाखाली पाण्याचा प्रश्न सुटावा, असा आशावाद कराड यांनी या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT