Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरही ‘ग्रीन झोन’मध्ये आणा - सुभाष देसाई 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद शहरही ‘ग्रीन झोन’मध्ये आणा - सुभाष देसाई 
औरंगाबाद : औरंगाबादच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यात यंत्रणेला यश मिळत आहे, ही समाधानकारक बाब असून, याच पद्धतीने शहरातील कोरोना संसर्गही आटोक्यात आणून ‘ग्रीन झोन’मध्ये आणा, अशा सूचना उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. ३०) मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, की शहरातील रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी ‘टास्क फोर्स’च्या सूचनांप्रमाणे उपचारपद्धती अधिक सशक्त करावी. महापालिकेने वॉर्डनिहाय ताप तपासणी शिबिरांचे आयोजन करावे.

यामध्ये खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी. जिल्हा रुग्णालय, घाटी व इतर रुग्णालये, उपचार केंद्रात ऑक्सिजन, रक्ताचा व्यापक साठा उपलब्ध करून ठेवावा. 
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी ‘घाटी’मध्ये अतिगंभीर रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या चांगले असल्याचे सांगितले. 

प्रशासक आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, घाटी रुग्णालयाचे डॉ. शिवाजी सुक्रे, औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार उपस्थित होते. 

टोळधाडीवर सज्ज ठेवा प्रतिबंधात्मक यंत्रणा 
राज्यात काही ठिकाणी टोळधाडीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज ठेवावी. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावे. ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. टँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित सुरू राहील, याची कटाक्षाने काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT