KCR  
छत्रपती संभाजीनगर

KCR in Maharashtra: "महाराष्ट्रात इतक्या नद्या तरीही जनता पाण्यावाचून" तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत राष्ट्र समितीची सभा पार पडली, यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांवर सडकून टीका केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत राष्ट्र समितीची सभा पार पडली, यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राज्यातील नेत्यांवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरही केसीआर यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रात मुबलक नद्या आहेत पण तरीही जनता पाण्यावाचून जगतेय, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

केसीआर म्हणाले, महाराष्ट्रात इतक्या मोठ-मोठ्या नद्या आहेत जितक्या इतर राज्यांमध्येही नसतील इतक्या नद्या असणारं ताकदवान राज्य नागरिकांना पिण्याचं पाणी देऊ शकत नाही. या परिस्थितीतही आमचा इतका नाईलाज आहे का? जनता सोन्याची वीट, चंद्रतारे थोडेच मागत आहे केवळ पिण्याचं पाणीच तर मागत आहे.

राजकारण्यांच्या वारंवार घोषणानंतर आणि राजकीय गोंधल घातल्यानंतरही पिण्याचं पाणी आपल्याला मिळू शकत नाही, असा भारत पुढेही रहावा की बदलायला हवा. बेरोजगारी वाढतेय, लाखो उद्योग बंद होताहेत. देशात जातीयवाद, धार्मिक, लिंगभेद सुरु आहे. जो श्रीमंत आहे तो अधिकच श्रीमंत होतोय, जो गरीब आहे तो अधिकच गरीब होतोय, हे वास्तव आहे.

जर हे असंच चालू द्यायचं नसेल तर आपल्यालाच आपली ही समस्या दूर करावी लागेल यासाठी कोणी अमेरिकेतून येणार नाही, कोणी रशियातून येणार नाही, कोणी दुसऱ्या देशाचे लोक येऊन आपल्यासाठी काम करणार नाही, त्यामुळं जेवढे लकवर आपण जागृत होऊ ते चांगलं राहिल. जर तुम्हाला हे बदलायचं असेल तर भारतात परिवर्तन घडवायसाठीच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष निर्माण झाला आहे. भारतवासियांच्या हक्कांच्या लढाईसाठी बीआरएसची निर्मिती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT