Ramdas Athavale 
छत्रपती संभाजीनगर

फडणवीस म्हणतात मी परत येईल तर ते अजित पवारांच्या भरवशावर : रामदास आठवले

मधुकर कांबळे

औरंगाबाद :  फडणवीस म्हणतात मी परत येईल तर ते अजित पवारांच्या भरवशावर अस म्हणत आहे. ते आले होते, त्यांनी राहायला पाहिजे होते, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.29) ते बोलत होते. आठवले म्हणाले, की शरद पवार यांचा आदर आम्ही करतो, त्यांना नेतृत्व मिळाले तर चांगलेच, पण काँग्रेस त्यांना संधी देणार नाही, काँग्रेस पक्ष आता तसा मोठा पक्ष राहिला नाही. शेतकरी आंदोलन करत असताना राहुल गांधीने इटलीचा दौरा करण्याची गरज नव्हती.

शेतकऱ्यांना असणारी भीती चुकीची आहे. गावांचा सर्व्हे करावा, एका गावात पाच एकर जमीन असायला हवी याची माहिती असावी. भूमीहिनांना जमिनी मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे, फॉरेस्टच्या जमिनीवर झाड येत नसतील तर त्या ठिकाणी शेती होऊ शकते, त्याची जमीन राज्य सरकारने परत घ्यावी. त्याऐवजी दुसरी जमीन द्यावी. त्यासाठी लवकरच आंदोलन होईल, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. बहुमताने कायदा मान्य झाला आहे. शरद पवार साहेबांनी बैठक घ्यावी. मात्र त्यांनी शेतकरी कायद्यांना विरोधासाठी विरोध न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा. त्यांनी विरोधकांसोबत चर्चा करावी आणि काही दुरुस्ती असले तर ती सुचवावी त्यावर नक्की विचार होईल. ते कृषिमंत्री होते. काँग्रेसच्या काळात कायदा प्रस्तावित होता.  कायदा रद्द करणे चुकीचे होईल. कायद्याचा स्वागत होईल असं वाटलं होतं.

शेतकरी आंदोलनाला आंदोलनकर्ते नेते जबाबदार आहे. तोडगा निघू शकतो. काही तडजोड करावी लागते. काही लोक हट्टाहास करत आहेत. सरकार चार पाऊल मागे आले आहे. एक कायदा मागे घेतला तर सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील. लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही. शेतकरी संघटनांची उद्या  बैठक होत आहे. त्यात जडजोडीचा मार्ग काढावा 2020 चे आंदोलन 2021 पर्यंत नेऊ नये. अदानी अंबानीला माल विकायचा नाही.  शेतकऱ्यांना जिथे जास्त भाव मिळेल तिथे त्यांनी तो विकावा असे कायदा सांगतो. अदानी अंबानीसाठी कायदा नाही, असे उत्तर शेती कायद्यांना  उद्योगधार्जीण असल्याच्या टीकेला आठवले यांनी दिले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT