औरंगाबाद : जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. आडगाव खुर्द (ता.फुलंब्री) (Phulambri) येथील विहिरीचे काम सुरु करायचे होते. त्यामुळे शेतकरी राजू साठे व बांधकाम व्यावसायिक देवीदास साळुंके हे दोघे सोमवारी (ता.१४) शेतात गेले होते. देविदास हे कुऱ्हाडीने विहिरी भोवती असलेले झाडे-झुडपे काढताना त्यांचा तोल गेला व ते विहिरीत पडले. त्यांना वाचविण्यासाठी राजू यांनी विहिरीत उडी मारली. दोघांचाही गाळात फसून मृत्यू झाला. वडोद बाजार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(Four People Drowned In Aurangabad)
औरंगाबादमधील (Aurangabad) जाकमाथा (ता.गंगापूर) येथील शेततळ्यात सुनिता राजीव कनोजी (वय १४, रा.झापडी, मध्य प्रदेश) व किरण कैलास जाधव (१३, रा.पिसणावल, मध्य प्रदेश) या मुली अंघोळीसाठी उतरल्या. मात्र त्या दोघींना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्या. दोघींना पाण्यातून काढून उपजिल्हा रुग्णालयात (Gangapur) दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक चौरे करित आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.