औरंगाबाद : हर्सूल भागातील नातेवाईकाडे आलेले कुटुंब भोपाळला जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले. सचखंड एक्स्प्रेसच्या तुडुंब भरलेल्या जनरल डब्यात घुसण्यापूर्वी सोबतचे साहित्य चढवले; मात्र रेल्वेत चढण्यासाठी जागाच नव्हती. कसेबसे रेल्वेत घुसण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रेल्वे निघाली. अखेर सामान पुढे गेले अन् प्रवासी कुटुंब मात्र रेल्वेस्थानकावरच राहिले. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर शुक्रवारी (ता. 27) ही घटना घडली. दरम्यान, हतबल झालेल्या कुटूंबाला रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवासी सेनेने मदतीचा हात दिला.
शहरातील हर्सूल परिसरातील नातेवाइकांकडे भोपाळ येथील कृष्णा, पत्नी कविता, आई कौसल्याबाई आणि दोन लहान मुले आलेले होते. हे कुटुंब परत भोपाळला जाण्यासाठी शुक्रवारी दुपारी एकच्या रेल्वेस्थानकावर आले. या कुटुंबासोबत बॅगा व अन्य सामान होते. दोन वाजता नांदेड अमृतसर (गाडी क्र. 12715) रेल्वेस्थानकावर आली. त्यावेळी रेल्वेचा जनरल डबा तुडुंब भरलेला होता. रेल्वेस्थानकावरही तोबा गर्दी झाली होती. कसेबसे रेल्वेत सामान चढवता आले; मात्र रेल्वेत घुसण्याचा संघर्ष सुरू असतानाच रेल्वे सुरू झाली. त्यामुळेच नाईलाज झाल्याने हतबल झालेले हे कुटुंब खालीच राहिले. त्यामुळे या कुटुंबाने सामान पुढे गेल्याने घरी जाण्याऐवजी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे यांची भेट घेऊन कैफियत सांगितली. त्याचवेळी रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी हेही उपस्थित होते.
हृदयद्रावक - आंधळ्या प्रेमाचा असा शेवट : वाचा करुण कहाणी
तातडीने मदतीचा हात
रेल्वे स्टेशन अधीक्षक एल. के. जाखडे, संतोष सोमाणी यांनी तातडीने रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती देऊन या प्रवासांचे सामान रेल्वेत गेल्याचे सांगितले. रेल्वे नियंत्रण कक्षाने मनमाड रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर श्री. जाखडे व श्री. सोमाणी यांनी या कुटुंबाला नांदेड मुंबई तपोवन एक्स्प्रेसने मनमाडला पाठवले. मनमाड पोलिसांची भेट घेऊन साहित्य परत घेऊन अन्य गाडीने भोपाळकडे जाण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा - धड होते रेल्वेपटरीवर, शिर मात्र गायब!
रेल्वे प्रवाशांना त्रास कायम
दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यावर सातत्याने अन्यय हातो आहे. मराठवाड्यात प्रचंड प्रवासी असतानाही रेल्वेला अधिकचे डबे जोडले जात नाहीत. सातत्याने मागणी करून नवीन रेल्वे सुरू केली जात नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तर प्रवाशंचा उद्रेक
दक्षिण मध्ये रेल्वेने मराठवाड्यातील गर्दी लक्षात घेऊन रेल्वे गाड्यांचे डबे वाढवण्याचे नियोजन केले पाहिजे. प्रवासी सातत्याने मागणी करूनही सोयी सुविधा दिल्या जात नाही. दक्षिण मध्ये रेल्वेच्या या भूमिकेमुळे प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो.संतोषकुमार सोमाणी अध्यक्ष रेल्वे प्रवासी सेना
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.