छत्रपती संभाजीनगर

वीस दिवसांनी कोरोनाबाधितांच्या यादीत नाव, रुग्णसंख्येचे आकडेवारी किती खरी?

आरोग्य विभागाकडून रोज जाहीर होणारी रुग्णसंख्या किती खरी आणि किती खोटी, असा प्रश्न पडला आहे. यामुळे मोठ्या रुग्णसंख्येमुळे लोकांना वाटणारी भीती आणि कमी रुग्णसंख्येमुळे वाटणारा दिलासा फुसकाबार ठरत आहे.

विकास गाढवे

लातूर : पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. उपचारानंतर ते बरे झाले व त्यांना रुग्णालयातून आठ दिवसांपूर्वी सुटी देण्यात आली. शुक्रवारी (ता. ३०) आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत त्यांचे नाव आहे. तब्बल वीस दिवसांनी त्यांची नावे यादीत आली. काही रुग्णांची नावे दोनवेळा आली आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांची नावेही अजून यादीत नाहीत. यामुळे आरोग्य विभागाकडून रोज जाहीर होणारी रुग्णसंख्या किती खरी आणि किती खोटी, असा प्रश्न पडला आहे. यामुळे मोठ्या रुग्णसंख्येमुळे लोकांना वाटणारी भीती आणि कमी रुग्णसंख्येमुळे वाटणारा दिलासा फुसकाबार ठरत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने रोज सायंकाळी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जाहीर केली जाते. यात आरटीपीसीआर आणि अँटीजेन तपासणीची संख्या व त्यातून सापडलेल्या रुग्णांची संख्या दिली जाते. यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्याही जाहीर केली जाते.

काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी पन्नास रुग्ण मृत्यू पावल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर मृत्यूची संख्या तीन दिवसांतील असल्याचा खुलासा द्यावा लागला. तेव्हा मृत्यूचे कारण निश्चित होण्यासाठी वेळ लागत असल्याने आजच्या मृत्यूची नोंद कधी कधी दोन दिवसांनीही होत असल्याचे उघड झाले. आता या मृत्यूसोबत रोजच्या कोरोना रुग्णांची नोंदही पंधरा ते वीस दिवसांनी उशिरा घेण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. कोरोना तपासणी करणाऱ्या सरकारी व खासगी संस्थांनी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांची माहिती त्याच दिवशी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक संस्थांकडे ही माहिती अपलोड करण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांचा जीव वाचवायचा की त्याची माहिती अपलोड करायची, असे उलट प्रश्न आरोग्य विभागाला केले जात आहेत. यामुळे आज पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांचे नाव दोन किंवा पंधरा दिवसांनी यादीत येत आहे. काही रुग्णांची नावे तर पॉझिटिव्ह येऊनही यादीत येताना दिसत नाहीत. चुकीचे नाव, पत्ते व मोबाईल नंबर हे तर प्रकार सर्रास घडतात. यामुळे रोजच्या कोरोना आकडेवारीला किती महत्त्व द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आजची नव्हे ती कालची आकडेवारी

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून येणारी रुग्णसंख्येची माहिती ही त्या दिवसाची नव्हे तर कालची असते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी रात्री बारापासून सुरू रात्री बारापर्यंतच्या कालावधित ऑनलाइन पोर्टलवर अपलोड झालेल्या रुग्णांची माहिती दुसऱ्या दिवशी देण्यात येत असल्याचे सांगितले. तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी सकाळी दहापासून दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत चोवीस तासात नोंद झालेल्या रुग्णांची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. रुग्णांची माहिती चोवीस तासात अपलोड करायला पाहिजे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. सध्या रुग्णांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने माहितीच्या तांत्रिक बाजूकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही डॉ. पाठक यांनी आवर्जून नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT