नुकसान.jpg 
छत्रपती संभाजीनगर

अतिवृष्टीने पाच लाखांवर शेतकऱ्यांचे नुकसान, मराठवाड्यातील भयावह चित्र ! 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : सतत मराठवाड्यावर नाराज असणारा मान्सून यंदा चांगला राहिला. परंतू हा पाऊस यावर्षी एवढा जास्त बरसला की मराठवाड्यातील तब्बल ५ लाख १३ हजार ४४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रातील खरिप पिकांचे प्रमाण जास्त आहे. 

बहुतांशवेळा मराठवाड्यात मान्सूनचे उशीरा आगमन होते आणि त्यातही समाधानकारक पाऊस बरसत नाही असा नेहमीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी मान्सून मराठवाड्यात चांगलाच बरसला. अपेक्षेपेक्षा जास्त चांगला पाऊस आला खरा मात्र या अतिवृष्टीमुळे आणि त्यातुन उदभवणाऱ्या पूरपरिस्थितीमुळे तब्बल ८ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची मोठी हानी झाली आहे.

औरंगाबाद व लातूर कृषि विभागांतुन मिळालेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ९७ हजार ५०७ शेतकऱ्यांचे, जालना ३ लाख ८९ हजार ८२९, बीड ११ हजार २३७ , नांदेड ३ हजार २८, हिंगोली ११ हजार ८१६ तर परभणी जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रात जिरायती क्षेत्रातील ३,०२०१४ हेक्टर, बागायती क्षेत्रातील १३५७६ तर फळपिकांच्या १२५८६ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे जूनपासून झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

SCROLL FOR NEXT