Maratha Kranti Morcha 
छत्रपती संभाजीनगर

BharatBandh : भारत बंदला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

प्रकाश बनकर

औरंगाबाद : भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सोमवारी (ता.७) प्रसार माध्यमांना दिली. याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या प्रसिध्दीपत्रका म्हटले आहे की, मराठा आरक्षण हा प्रश्न समोर येण्याचे मुख्य कारण शेतीच आहे. ८० टक्के मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. हमी भाव नसल्याने शेतकरी बांधवांचे नुकसान होते. यामूळे दैनंदिन गरजा सोबत मुलांचे शिक्षण हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने मराठा आरक्षणाची मागणी समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण आणि शेतकऱ्यांना स्वरक्षण व स्वामिनाथन आयोग लागू करावा हे विषय महत्वाचे असल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निघाले.

बैठकीत समन्वयक चंद्रकांत भराड, किशोर चव्हाण, सुरेश वाकडे, राजेंद्र दाते पाटील, शिवानंद भानुसे, सतिश वेताळ, मनोज गायके, रमेश गायकवाड, प्रदिप हार्दे, रेखा वहाटूळे,सुकन्या भोसले, रेणुका सोमवंशी, आत्माराम शिंदे, शिवाजी जगताप, गणपत म्हस्के, अंकत चव्हाण, योगेश औताडे, अमोल साळुंके, विलास औताडे, अजय गंडे, चंद्रशेखर निकम, अनिल पोळ, वैभव बोडखे, विशाल वेताळ,अनिल तुपे, सुभाष सुर्यवंशी, संजय जाधव, रविंद्र वाहटुळे यांचा समावेश होता.

Edited - Ganesh Pitekar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT