file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

कॉंग्रेसबरोबर गेल्याने मानिकसता बदलली का ? - हरिभाऊ बागडे

प्रकाश बनकर

औरंगाबाद: महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री-गृहमंत्री होते. या दोघांनी बांगलादेशाच्या लोकांना परत पाठवले. ते शिवसेनेचे लोक एवढ्या लवकर विसरले का? आता तुम्ही कॉंग्रेससोबत गेल्याने, तुमची मानसिकता बदलली का? असा टोला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नागरिकत्व कायद्यावरून शिवसेनेला लगावला. 

राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बुधवारी (ता.25) शहरात भव्य फेरी काढण्यात आली. फेरीचा समारोप सभेने झाला. यावेळी श्री. बागडे बोलत होते. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून फेरी काढण्यात आली.

उई सार्पोट सीएए'

फेरीत "उई सार्पोट सीएए', "तिरंगे के सन्मान मे देशभक्‍त मैदान मे', "सीएए के सन्मान मे देशभक्‍त मैदान मे' यासह "मोदी.. मोदी...' यासह तिरंगा झेंडा घेऊन विविध घोषणा फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या. क्रांती चौकातून निघालेली फेरी जिल्हा न्यायालय, विवेकानंद महाविद्यालयात, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, निराला बाजार येथून औरंगापुऱ्यात आली व महात्मा फुले चौकात फेरी समारोप झाला. 

पाकिस्तानातून शहरात पंधरा ते तीस वर्षांपासून राहणाऱ्यांचा सत्कार 

या फेरीत पाकिस्तानातून शहरात पंधरा ते तीस वर्षांपासून राहणारे किशोर बोधाणी, विकी तलरेजा, बलराम पारसवाणी, श्रीचंद्र तालेजा, अमृत नाथानी यांना या कायद्या अंतर्गत नागरिकत्व मिळणार आहे. या पाचही जणांना माजी राज्यमंत्री अतुल सावे, किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव, अप्पा बारगजे, दयाराम बसैय्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कायदा करा म्हणणारे आता गांधीजींच्या समाधीजवळ बसले 

बागडे म्हणाले, हा कायदा सहा धर्मासाठी आहे. हिंदू, शीख, पारशी, बौद्ध, जैन आणि मुस्लिमासाठी हा कायदा आहे. बौद्ध धर्मावर मोठा अत्याचार झाला आहे. हे नागरिक मोर्चे काढतात यांचे वाईट वाटते. हा कायदा संसदेने पास केला. 2003 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत विरोधीपक्षनेते असताना या कायद्यासाठी मागणी केली होती. मात्र आता त्यांना विसर पडला आहे. ते गांधीच्या समाधीजवळ जाऊन बसले आहेत. कॉंग्रेसने ठरवले असते तर झाले असते तर तेव्हाच कायदा झाला असता. शिवसेनेही युतीच्या काळात बांगलादेशातील नागरिकांना परत पाठविले होते. ते दिवस आठवावेत. देशाच्या संदर्भात राष्ट्रविषयाची भावना सर्व नागरिका विषयी एक असली पाहिजेत. शिवसेनेनेही अशी भावना ठेवावी असेही बागडे म्हणाले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT