mns.jpg 
छत्रपती संभाजीनगर

बोगस बी-बियाणे विकणाऱ्‍यांना ठोकणार..! वाचा कोणी दिला इशारा.. 

अतुल पाटील

औरंगाबाद : बोगस खते आणि बी बियाणे विक्री करणाऱ्यांना प्रशासनाने रोखावे, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिला आहे. मागणींचे निवेदन त्यांनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनाही दिले. 

निवेदनात म्हटले कि, बोगस खते बी-बियाणे याबाबत कृषी संचालक यांना निवेदन दिले होते. तसेच कृषी अधिकारी यांनीही दखल घेण्याचे आश्वासन दिले होते परंतु, शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना त्याची कोणीही दखल घेतलेली नाही. यासंदर्भात पाठपुरावा करून देखील कागदोपत्री अथवा प्रत्यक्ष कुठल्याही स्वरूपाची विक्रेत्यांवर कारवाई केली नाही. कार्यालयांकडूनही उत्तर मिळाले नाही, ही गंभीर बाब आहे. 

शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांना खत आणि बी-बियाणे विक्रेत्यांकडून अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु संबंधित विक्रेते हे लालसेपोटी व वैयक्तिक स्वार्थापोटी शेतकऱ्यांना बोगस दर्जाची बियाणे देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान करत आहेत. प्रत्येक शेतकरी साक्षर असेलच असे नाही. त्यांची फसवणूक होत आहे. मे २०२० या एका महिन्यातच मराठवाड्यात जवळपास १०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याची गंभीरता ओळखून कार्यवाही व्हावी. 

राज्याचे कृषिमंत्री यांनी जून महिन्यात औरंगाबाद येथे बोगस बियाणे, खत दुकानदार व साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांवर छापे टाकून कारवाई केली. यानंतरही शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पालकमंत्री म्हणून विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मनसे अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र आंदोलन करेल, त्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही. असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. निवेदन देताना डॉ. विलास जगदाळे, संदीप कुलकर्णी, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर यांची उपस्थिती होती. 

संपादन : प्रताप अवचार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT