औरंगाबाद - तुडूंब भरलेला हर्सुल तलाव
औरंगाबाद - तुडूंब भरलेला हर्सुल तलाव 
छत्रपती संभाजीनगर

  निजामकालीन तलावातून मिळणार यंदा पिण्यासाठी पाणी 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : निजाम स्टेटने साठ दशकांपूर्वी त्यावेळच्या लोकसंख्येला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी हर्सुल तलाव तयार केला. यानंतर महापालिकेकडूनही जुन्या शहरातील काही वॉर्डांना इथून पाणीपुरवठा केला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासुन पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने या तलावातून पाणीपुरवठा बंद होता. आता चौदा वर्षानंतर या तलावात साठा लक्षणीय वाढल्याने शहरातील तब्‍बल १३ वॉर्डांना पुन्हा पाणी पुरवठा होणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने जलशुद्धीकरण यंत्रणा व दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. 

निजाम स्टेटने १९५४ मध्ये हर्सूल तलावाची निर्मिती केली. त्यावेळी ५२ नहरी व हर्सूल तलावातून साडे अकरा एमएलडी पाणी पुरवठा केला जायचा. नंतरच्या काळातही हर्सूल तलावात मुबलक साठा झाल्यावर शहरातील १५ ते १८ वॉर्डांना दररोज ५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतू गेल्या काही वर्षांपासून तलाव भरत नव्हता. यंदा चांगला पाऊस होत असल्याने २८ फुट साठवण क्षमता असलेल्या तलावात शनीवार (ता.एक) पर्यंत २५ फुटांपेक्षा अधिक पाणी साठले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पाणीपुरवठा विभागाने तलावातून शहराला पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू केली आहे. शनिवार (ता.एक) पासून येथील जलशुद्धीकरण यंत्रणेच्या स्वच्छता व दुरूस्तीचे काम जलदगतीने करण्यात आला आहे. रविवारी सकाळीच काम सुरू करण्यात आले. पुढील आठवड्यापासून तलावातून पुरवठा सुरू केला जाईल, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले. हे पाणी आरेफ कॉलनी, दिल्लीगेट परिसर, शहागंजसह जुन्या शहरातील १२ ते १३ वॉर्डांना दिले जाणार असल्योचही त्यांनी स्पष्ट केले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सांडवा परिसरातील गाळ दूर 

हर्सुल तलावातील जलशुद्धीकरण यंत्रणा जुनी आहे. पाच वर्षांपासून ती बंद आहे. यामुळे वॉटर टँक, फिल्टर टँकमध्ये बराच गाळ साचला आहे, तो काढण्याचे काम सध्या सुरू असून यंत्रणेही स्वच्छताही केली जात आहे. रविवारी तलावाच्या सांडवा परिसरातही जेसीबीने गाळ व कचरा दूर करण्यात आला. मध्यंतरीच्या काळात भूमिगत गटार योजनअंतर्गत ड्रेनेजलाइन टाकण्यात आल्या आहेत. हे काम करताना हर्सूल तलावापासून ते दिल्लीगेट येथील जलकुंभापर्यंत असलेल्या जलवाहिनीची अवस्था कशी झाली आहे याची तपासणी केली जाणार आहे. तलाव ते फिल्टर टँक ते दिल्लीगेट जलकुंभापर्यंत पाच किलोमीटरपर्यंतच्या जलवाहिनीची तपासणी केली जाणार आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT