3Corona_102
3Corona_102 
छत्रपती संभाजीनगर

प्रवासी वाढविणार कोरोना! संचखंडमधून २२ तर विमानातून चार जण पॉझिटिव्ह

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची लाट असलेल्या चार राज्यातून शहरात येणाऱ्या प्रवाशांवर महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशन व विमानतळावर चाचणी केली जात आहे. सचखंड एक्सप्रेसमधून आलेले २२ प्रवासी आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले तर विमानतळावर चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांमार्फत कोरोना संसर्ग वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सचखंड एक्सप्रेसने शहरात दररोज दोनशे ते अडीचशे प्रवासी येतात. या प्रवाशांची रविवारपासून (ता. २२) ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. सचखंडने एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांपैकी आत्तापर्यंत २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानतळावर देखील चाचण्या केल्या जात आहेत. विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रेल्वेस्टेशन, विमानतळ व्यतिरिक्त शहरात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात नाही.

त्यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना धोका वाढण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान सचखंड एक्स्प्रेसने शुक्रवारी शहरात आलेल्या २१७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातून तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले. विमानतळावर दिवसभरात ४९ विमान प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. गुरूवारी केलेल्या चाचण्यांतून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT