Soybean Damaged 
छत्रपती संभाजीनगर

खरीप गेले, तर रब्बीची पेरणी लांबली; परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान

मधुकर कांबळे

औरंगाबाद : परतीच्या पावसाने मराठवाड्याच्या विविध भागात मोठे नुकसान केले आहे. पण रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली आहे.मराठवाड‌यात गेल्या शुक्रवारपासून औरंगाबादसह काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले नगदी पीक हिरावून नेले. काढणी करून शेतातच ठेवलेली खरीप पिके पाण्यात गेली आहेत.

हा परतीचा पाऊस की एखादे वादळ आहे याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे भूगोल विभागप्रमुख तथा हवामानाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, की बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे वादळ अरबी समुद्रात स्थिरावेल. तामिळनाडू, कर्नाटक करत महाराष्ट्रात हे वादळ धडकले आहे. यात विशेषतः: मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्हे तर बीड जिल्ह्याचा काही भाग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. हवामान खात्याने याला ईशान्य मान्सून वारेच म्हटले आहे. मात्र हे वादळ आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत वादळानेच पाऊस पडत आला आहे मात्र यावेळच्या वादळाने मराठवाड्याचे नुकसान केले आहे.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयक कृषी हवामान योजनेचे कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले, की साधारणतः ८ ते १२ ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपून जातो. मात्र बंगालच्या सागरातून आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मान्सून लांबला. आणखी आठवडाभर अशीच स्थिती राहून या महिन्याच्या अखेरपर्यंत हळूहळू मान्सून कमी होईल. या पावसाने खरिपाचे नुकसान केले आहे. तर रब्बीच्या पेरणीवरही परिणाम होणार आहे. सोयाबीनची काढणी झाली की, रान मोकळे झाले आणि पाऊस परत गेला की रब्बीची पेरणी केली जाते मात्र आता सतत पाऊस सुरू असल्याने जमीन वापसास्थितीत नाही. पर्यायाने रब्बीच्या पेरणीला उशीर होणार असल्याचे डॉ. डाखोरे म्हणाले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT