औरंगाबाद : कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे विदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. गेल्या दोन आठवड्यात विमानाने शहरात आलेल्या १६ जणांची महापालिकेने आरटीपीसीआर चाचणी केली होती. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
तळ प्राधिकरणाकडून मागविली होती. गेल्या दहा ते पंधरा दिवसात विदेशातून औरंगाबाद शहरात ३२ जण आल्याचे समोर आले होते. यातील २४ जण शहरातील होते. तीन जण ग्रामीण भागातील तर पाच जण जिल्ह्याबाहेरील होते. २४ जणांपैकी १९ जण विदेशातून प्रवास करून आलेले तर पाच जण पर्यटक होते. १९ जणांपैकी १६ जणांची आरटीपीसीआर चाचणी गुरुवारी (ता. दोन) करण्यात आली.
सोळा जणांच्या चाचणीचे अहवाल शुक्रवारी (ता. तीन) प्रशासनाला प्राप्त झाले. हे अहवाल निगेटिव्ह असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. पाच पर्यटकांपैकी तीन पर्यटक दिल्लीला परतले, त्यांच्याकडे कोरोना चाचणी अहवाल होते, हे अहवाल निगेटिव्ह होते. उर्वरित दोन जणांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. जे तीन नागरिक बाहेर गावी गेले आहेत त्यांच्याशी संपर्क झाला असून, औरंगाबादेत परतल्यावर त्यांची चाचणी केली जाणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. या अहवालामुळे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.