Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

...तर औरंगाबादेत १५ दिवस कडक लॉकडाउन

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मोठ्या कंपन्यांमधील कामगारही बाधित होत आहेत. सांगूनही लोकांनी ऐकले नाही, नियम पाळले नाहीत, विलगीकरण कक्षाऐवजी होम क्वारंटाइन सुरू केले. असेच सुरू राहिले तर कडक लॉकडाउन करावा लागेल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे. 

लॉकडाउनचा मोठा कालावधी लोटल्यानंतर त शिथिलता देण्यात आली. त्यानंतर उद्योगासोबतच अनेक दुकानेही सुरू झाले; मात्र कोरोनाबाबत काळजी घेण्याबाबत काही उद्योगांचा प्रतिसाद मिळत नाही. एका बड्या उद्योगामध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. विलगीकरणही त्यांचे त्यांनाच करावे लागणार आहे. येत्या काळात लहान-मोठ्या उद्योगांनी याबाबत काळजी घेतली नाही, प्रतिसाद दिला नाही तर प्रसंगी औरंगाबाद शहरासह वाळूजमधील उद्योगही १५ दिवस बंद करावे लागतील, असे श्री. केंद्रेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

तीन ते पाच जूनदरम्यान नियमांचे पालन करण्याच्या अटीवर शहरात टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू करण्यात आले. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळाले. ते गरजेचेही होते. मात्र, कोरोनाचा धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीणमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. शहर परिसरात असलेल्या उद्योगांनाही नियम व अटींच्या आधारावर उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळाली; मात्र वाळूजमधील मोठ्या कंपन्यांमधील कामगारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत केंद्रेकर म्हणाले, की उद्योगांनाही कोरोना नियंत्रणासंदर्भात काळजी घ्यावी लागेल. वाळूजसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे; तसेच सहायक आयुक्त शिवाजी शिंदे हे दोन अधिकारी नियुक्त केले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काय काय उपाययोजना करायला हव्यात, याबाबत हे अधिकारी निर्णय घेतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB १६,५०० कोटींना विकली... माल्ल्याला किती मिळाले; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!

Ram Navami: योगींनी बदललं आणखी एका गावाचं नाव, त्या काळरात्रीनंतर लेकी-बाळांना मिळालं हक्काचं घर, काय आहे रामनवमी कनेक्शन ?

Latest Marathi News Live Update : परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट वडेट्टीवार यांचे आरोप

Land Acquisition Kolhapur Airport : कोल्हापूर -हुपरी राज्यमार्ग होणार बंद! विमानतळासाठी जमीन होणार संपादीत, ५० कोटींचा निधी मंजूर

Phaltan News: फलटणला नामांतरांचा ठराव मंजूर! पालिकेच्या पहिल्याच सभेत राजे- खासदार गटांत संघर्षाची ठिणगी; जोरदार शाब्दिक चकमक!

SCROLL FOR NEXT